शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजींना सेवाश्री पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:51 IST

२२ व्या विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी सायंकाळी पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी यांना पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे दुसर्‍यांसाठी जगण्यातच खरे समाधान - डॉ. भांडारकर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनुष्य आयुष्यभर स्वत:साठी जगत असतो. मान, सन्मान, प्रतिष्ठा, पैसा मिळविण्यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. अनेकांना तर ज्ञानाचा, सौंदर्याचा, पैशांचा अहंकार असतो; परंतु जगाचा निरोप घेताना, सर्वकाही येथेच सोडून जावे लागते. जगज्जेता सिकंदरसुद्धा जाताना काहीच सोबत नेऊ शकला नाही. त्यामुळे स्वत:साठी जगण्यापेक्षा, दु:खी, पीडित लोकांसाठी जगावे, यातच खरे समाधान आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे माजी अधिष्ठाता डॉ. के.एम. भांडारकर यांनी व्यक्त केले. २२ व्या विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळय़ात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे होते. विचारपीठावर सत्कारमूर्ती म्हणून वाशिमचे ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी, सेवाश्रीचे संयोजक विजय सत्यनारायण रांदड होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी यांना पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मारशेटवार गुरुजी, त्यांच्या धर्मपत्नी शोभा मारशेटवार, चिरंजीव रवी व अविनाश यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी डॉ. भांडारकर म्हणाले, स्मशानभूमीमध्ये फारसे कोणी जात नाही; परंतु विदारक अशा स्मशानभूमीमध्ये मारशेटवार गुरुजी यांनी जाऊन, लोकांकडून पैसा गोळा करून स्मशानभूमीचा विकास घडवून आणला आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर स्मशानभूमीचे निर्माण केले. हे दुर्मिळ कार्य आहे. ते संस्कृती टिकविण्याच्या मार्गावरील पथदीप आहेत, अशा शब्दात त्यांनी मारशेटवार गुरुजींच्या कार्याची स्तुती केली. कार्यक्रमाला डॉ. नानासाहेब चौधरी, महादेवराव भुईभार, डॉ. राजीव बियाणी, गोपाल खंडेलवाल, प्रकाश वाघमारे, पत्रकार संदीप भारंबे यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे प्रा. राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार शौकतअली मिरसाहेब, हरिश मानधने आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे शुभांगी रांदड, शकुंतला रांदड, नीलेश मालपाणी, अनिल भुतडा, दीपक रांदड, राज रांदड यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सेवाश्रीचे संयोजक विजय रांदड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शारदा बियाणी, प्रा. डॉ. किरण वाघमारे यांनी करून दिला. बहारदार संचालन नीशा पंचगाम यांनी केले. आभार शुभम रांदड याने मानले. (प्रतिनिधी) 

समाजऋण फेडण्याचा प्रयत्न: मारशेटवार गुरुजीज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. निसर्ग, समाजातून आपल्याला खूप काही मिळते; परंतु मनुष्य नुसते, घेण्याचे काम करतो, देण्याचे नाही. समाजाने दिलेले आपल्याला परत करायचे आहे, या विचाराने मी शिक्षक सेवेचा वसा सांभाळत, समाज कार्याला सुरुवात केली. लोकांनी माझ्या झोळीत टाकलेल्या पैशांतून स्मशानभूमीचा विकास केला. पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचे काम करतो. अशा शब्दात माधवराव मारशेटवार गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्कार व्यक्तीचा नाही तर कार्याचा- प्रा. खडसेराष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांनी दु:खी, कष्टी, शोषित समाजाच्या उन्नतीसाठी देह झिजविला. पैसा तर सर्वच कमावितात; परंतु समाधान केवळ दुसर्‍यांसाठी जगणारे मिळवितात. देवळात जाऊन समाधान मिळत नाही. गोरगरीब, गरजूंची सेवा करण्यात खरे समाधान मिळते आणि सत्कार कधीच व्यक्तीचा होत नाही. त्याने केलेल्या कार्याचा नेहमी गौरव होतो, असे मनोगत प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर