शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजींना सेवाश्री पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:51 IST

२२ व्या विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी सायंकाळी पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी यांना पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे दुसर्‍यांसाठी जगण्यातच खरे समाधान - डॉ. भांडारकर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनुष्य आयुष्यभर स्वत:साठी जगत असतो. मान, सन्मान, प्रतिष्ठा, पैसा मिळविण्यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. अनेकांना तर ज्ञानाचा, सौंदर्याचा, पैशांचा अहंकार असतो; परंतु जगाचा निरोप घेताना, सर्वकाही येथेच सोडून जावे लागते. जगज्जेता सिकंदरसुद्धा जाताना काहीच सोबत नेऊ शकला नाही. त्यामुळे स्वत:साठी जगण्यापेक्षा, दु:खी, पीडित लोकांसाठी जगावे, यातच खरे समाधान आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे माजी अधिष्ठाता डॉ. के.एम. भांडारकर यांनी व्यक्त केले. २२ व्या विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळय़ात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे होते. विचारपीठावर सत्कारमूर्ती म्हणून वाशिमचे ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी, सेवाश्रीचे संयोजक विजय सत्यनारायण रांदड होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी यांना पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मारशेटवार गुरुजी, त्यांच्या धर्मपत्नी शोभा मारशेटवार, चिरंजीव रवी व अविनाश यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी डॉ. भांडारकर म्हणाले, स्मशानभूमीमध्ये फारसे कोणी जात नाही; परंतु विदारक अशा स्मशानभूमीमध्ये मारशेटवार गुरुजी यांनी जाऊन, लोकांकडून पैसा गोळा करून स्मशानभूमीचा विकास घडवून आणला आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर स्मशानभूमीचे निर्माण केले. हे दुर्मिळ कार्य आहे. ते संस्कृती टिकविण्याच्या मार्गावरील पथदीप आहेत, अशा शब्दात त्यांनी मारशेटवार गुरुजींच्या कार्याची स्तुती केली. कार्यक्रमाला डॉ. नानासाहेब चौधरी, महादेवराव भुईभार, डॉ. राजीव बियाणी, गोपाल खंडेलवाल, प्रकाश वाघमारे, पत्रकार संदीप भारंबे यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे प्रा. राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार शौकतअली मिरसाहेब, हरिश मानधने आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे शुभांगी रांदड, शकुंतला रांदड, नीलेश मालपाणी, अनिल भुतडा, दीपक रांदड, राज रांदड यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सेवाश्रीचे संयोजक विजय रांदड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शारदा बियाणी, प्रा. डॉ. किरण वाघमारे यांनी करून दिला. बहारदार संचालन नीशा पंचगाम यांनी केले. आभार शुभम रांदड याने मानले. (प्रतिनिधी) 

समाजऋण फेडण्याचा प्रयत्न: मारशेटवार गुरुजीज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. निसर्ग, समाजातून आपल्याला खूप काही मिळते; परंतु मनुष्य नुसते, घेण्याचे काम करतो, देण्याचे नाही. समाजाने दिलेले आपल्याला परत करायचे आहे, या विचाराने मी शिक्षक सेवेचा वसा सांभाळत, समाज कार्याला सुरुवात केली. लोकांनी माझ्या झोळीत टाकलेल्या पैशांतून स्मशानभूमीचा विकास केला. पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचे काम करतो. अशा शब्दात माधवराव मारशेटवार गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्कार व्यक्तीचा नाही तर कार्याचा- प्रा. खडसेराष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांनी दु:खी, कष्टी, शोषित समाजाच्या उन्नतीसाठी देह झिजविला. पैसा तर सर्वच कमावितात; परंतु समाधान केवळ दुसर्‍यांसाठी जगणारे मिळवितात. देवळात जाऊन समाधान मिळत नाही. गोरगरीब, गरजूंची सेवा करण्यात खरे समाधान मिळते आणि सत्कार कधीच व्यक्तीचा होत नाही. त्याने केलेल्या कार्याचा नेहमी गौरव होतो, असे मनोगत प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर