शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजींना सेवाश्री पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:51 IST

२२ व्या विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी सायंकाळी पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी यांना पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे दुसर्‍यांसाठी जगण्यातच खरे समाधान - डॉ. भांडारकर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनुष्य आयुष्यभर स्वत:साठी जगत असतो. मान, सन्मान, प्रतिष्ठा, पैसा मिळविण्यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. अनेकांना तर ज्ञानाचा, सौंदर्याचा, पैशांचा अहंकार असतो; परंतु जगाचा निरोप घेताना, सर्वकाही येथेच सोडून जावे लागते. जगज्जेता सिकंदरसुद्धा जाताना काहीच सोबत नेऊ शकला नाही. त्यामुळे स्वत:साठी जगण्यापेक्षा, दु:खी, पीडित लोकांसाठी जगावे, यातच खरे समाधान आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे माजी अधिष्ठाता डॉ. के.एम. भांडारकर यांनी व्यक्त केले. २२ व्या विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळय़ात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे होते. विचारपीठावर सत्कारमूर्ती म्हणून वाशिमचे ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी, सेवाश्रीचे संयोजक विजय सत्यनारायण रांदड होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी यांना पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मारशेटवार गुरुजी, त्यांच्या धर्मपत्नी शोभा मारशेटवार, चिरंजीव रवी व अविनाश यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी डॉ. भांडारकर म्हणाले, स्मशानभूमीमध्ये फारसे कोणी जात नाही; परंतु विदारक अशा स्मशानभूमीमध्ये मारशेटवार गुरुजी यांनी जाऊन, लोकांकडून पैसा गोळा करून स्मशानभूमीचा विकास घडवून आणला आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर स्मशानभूमीचे निर्माण केले. हे दुर्मिळ कार्य आहे. ते संस्कृती टिकविण्याच्या मार्गावरील पथदीप आहेत, अशा शब्दात त्यांनी मारशेटवार गुरुजींच्या कार्याची स्तुती केली. कार्यक्रमाला डॉ. नानासाहेब चौधरी, महादेवराव भुईभार, डॉ. राजीव बियाणी, गोपाल खंडेलवाल, प्रकाश वाघमारे, पत्रकार संदीप भारंबे यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे प्रा. राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार शौकतअली मिरसाहेब, हरिश मानधने आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे शुभांगी रांदड, शकुंतला रांदड, नीलेश मालपाणी, अनिल भुतडा, दीपक रांदड, राज रांदड यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सेवाश्रीचे संयोजक विजय रांदड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शारदा बियाणी, प्रा. डॉ. किरण वाघमारे यांनी करून दिला. बहारदार संचालन नीशा पंचगाम यांनी केले. आभार शुभम रांदड याने मानले. (प्रतिनिधी) 

समाजऋण फेडण्याचा प्रयत्न: मारशेटवार गुरुजीज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. निसर्ग, समाजातून आपल्याला खूप काही मिळते; परंतु मनुष्य नुसते, घेण्याचे काम करतो, देण्याचे नाही. समाजाने दिलेले आपल्याला परत करायचे आहे, या विचाराने मी शिक्षक सेवेचा वसा सांभाळत, समाज कार्याला सुरुवात केली. लोकांनी माझ्या झोळीत टाकलेल्या पैशांतून स्मशानभूमीचा विकास केला. पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचे काम करतो. अशा शब्दात माधवराव मारशेटवार गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्कार व्यक्तीचा नाही तर कार्याचा- प्रा. खडसेराष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांनी दु:खी, कष्टी, शोषित समाजाच्या उन्नतीसाठी देह झिजविला. पैसा तर सर्वच कमावितात; परंतु समाधान केवळ दुसर्‍यांसाठी जगणारे मिळवितात. देवळात जाऊन समाधान मिळत नाही. गोरगरीब, गरजूंची सेवा करण्यात खरे समाधान मिळते आणि सत्कार कधीच व्यक्तीचा होत नाही. त्याने केलेल्या कार्याचा नेहमी गौरव होतो, असे मनोगत प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर