शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पदभरतीसाठी मराठा आरक्षणाची पदे वगळली जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:55 IST

अकोला: राज्यात नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार पुढील भरती वर्षासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी आरक्षणाची गणना झाली.

- सदानंद सिरसाटअकोला: राज्यात नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार पुढील भरती वर्षासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी आरक्षणाची गणना झाली. त्यावर आधारित पदसंख्येची भरती प्रक्रिया लगतच्या बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाली; मात्र त्याचवेळी शासनाने २७ फेब्रुवारी रोजी या प्रवर्गातील आरक्षित पदांवर नियुक्त्या देऊ नये, असा आदेश दिल्याने या दोन्ही जिल्ह्यांतील भरती प्रक्रियेचा आता गोंधळ होणार आहे.राज्यात २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२ नुसार महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गासाठी जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण अधिनियम २०१८ लागू करण्यात आला. त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी १६ टक्के आरक्षण देण्यात आले. पदभरतीमध्ये आरक्षण देण्यासाठी बिंदू नामावलीमध्ये सरळसेवा भरतीच्या पदांसदर्भात २९ मार्च १९९७ च्या शासन निर्णयातही सुधारणा करण्यात आली आहे. बिंदू नामावली ठरविण्याच्या पद्धतीत ५ डिसेंबर २०१८ रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला.मराठा समाजाला देय १६ टक्के आरक्षणानुसार सरळसेवेची १०० बिंदू नामावली ठरविण्याची पद्धत शासनाने ठरवून दिली आहे. ३० नोव्हेंबर २०१८ नंतरच्या पदभरतीसाठी ही बिंदू नामावली लागू करण्याचेही शासनाने म्हटले होते. रिक्त असणारी पदे, त्यानंतर सरळसेवेच्या कोट्यातील संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन चालू भरती वर्षात तसेच पुढील भरती वर्षासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी आरक्षणाच्या गणनेची १०० बिंदू नामावलीची तयारी राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, निमशासकीय कार्यालये, शाळा, विद्यापीठे, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम तसेच शासन अनुदानित मंडळांमध्ये झाली.- ‘एसईबीसी’ राखीव पदांमुळे होणार बदल!त्यानुसार लगतच्या वाशिम, बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने २८ फेब्रुवारी रोजी तलाठी संवर्गातील पदे भरतीची प्रक्रिया सुरू केली. जाहिरातीत सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग (एसईबीसी)साठी बुलडाणा जिल्ह्यात ४९ पैकी ७ तर वाशिम जिल्ह्यात २२ पैकी ४ पदे राखीव दर्शविण्यात आली. शासनाने २७ फेब्रुवारी रोजीच्या निर्णयात न्यायालयीन प्रक्रियेचा हवाला देत नियुक्त्या न देण्याचे म्हटले. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे आहेत. जाहिरातीतील पदांची संख्या कमी-अधिक होऊ शकते, असे नमूद केलेले असते. शासनाच्या मार्गदर्शनानुसार त्यामध्ये बदल केला जाईल.- प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, बुलडाणा.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaratha Reservationमराठा आरक्षण