शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

भ्रष्टाचारासाठी प्रशासनाच्या हातावर ‘तुरी’; ग्रेडींग नावापुरतेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 15:00 IST

अकोला - राज्यशासनाने ‘नाफेड’ मार्फत सुरू केलेल्या तूर खरेदीत नियमांना सोयीनुसार वाकवित प्रशासनाच्या हातावर तुरी देत भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देवखार महामंडळाच्या अकोला जिल्ह्यातील गोदामांत जागा उपलब्ध नसल्याचे सांगून वारंवार तूर-हरभरा खरेदी बंद करण्यात आली. मात्र त्याचवेळी बुलडाण्यासह वाशिम, अमरावती जिल्ह्याबाहेरील तूर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील गोदामांत साठविण्यात आली. ही बाब खासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे यांनी सोमवारी उघड केली.

- राजेश शेगोकार

अकोला - राज्यशासनाने ‘नाफेड’ मार्फत सुरू केलेल्या तूर खरेदीत नियमांना सोयीनुसार वाकवित प्रशासनाच्या हातावर तुरी देत भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. वखार महामंडळाच्या अकोला जिल्ह्यातील गोदामांत जागा उपलब्ध नसल्याचे सांगून वारंवार तूर-हरभरा खरेदी बंद करण्यात आली; मात्र त्याचवेळी बुलडाण्यासह वाशिम, अमरावती जिल्ह्याबाहेरील तूर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील गोदामांत साठविण्यात आली. ही बाब खासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे यांनी सोमवारी उघड केली. त्यांनतर मंगळवारी वखार महामंडळाच्या ‘एमआयडीसी’ मधील गोदामात साठविण्यात आलेल्या तुरीची खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी झाडाझडती घेतली असता, गोदामात जिल्ह्याबाहेरील साठविण्यात आलेली तूर निकृष्ट दर्जाची तसेचे सिमेंट मिश्रीत असल्याचे चव्हाट्यावर आले. एमआयडीसीमधील एक गोदाम हे केवळ प्रातिनिधीक आहे. नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे प्रत्येक गोदाम तपासले तर नॉन एफएक्यु दर्जाची तुर खरेदी केल्याचे समोर येईल. तुर खरेदी साठी केलेले नियम हे अतिशय कठीण असतानाही प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या साखळीने शेतकऱ्यांची तुर बाजुला ठेवत ज्यामधून मलिदा मिळेल अशीच तुर खरेदी करण्यास सर्वात आधी प्राधान्य दिल्याचे चौकशीत समोर येईल अशी स्थिती आहे. तुर खरेदीतील भ्रष्टाचार हा चार पातळीवर झाल्याचे दिसून येते. सर्वात आधी म्हणजे तुर खरेदी साठी शेतकºयांना आपल्या सात-बारा पेरेपत्रकासह नोंदणी करावी लागते येथेच तुर खरेदीच्या भ्रष्टाचाराला सुरवात होते. तुरीची विक्री करून त्याचे पैसे मिळेपर्यंत प्रतीक्षा करण्याची ऐपत अनेक शेतकºयांची नसते अशा शेतकºयांची तुर दलाला मार्फत कमी भावात खरेदी करून नंतर त्याच शेतकºयाच्या सातबारावर नोंदणी करणारी एक साखळी या यंत्रणेत कार्यतर आहे. विशेष म्हणजे पेरेपत्रक मॅनेज करून नोंदणी करण्याचाही प्रकार झालेला आहे. ज्या खरेदी-विक्री संघामध्ये तुर विक्रीसाठी टोकणकरिता नोंदणी करावी लागते तेथे जो पहिला येईल त्याची नोंदणी पहिली होणे अपेक्षीत आहे प्रत्यक्षात या नियमाला बगल दिल्या गेली त्यामुळेच खºया शेतकºयांना रांगेत उभे ठेवत अनेक ठिकाणी दलालांनी नोंदविलेल्या नावांना प्राधान्य दिले गेले. सहाजिकच पुढच्या ‘गे्रडींग’ च्या पातळीवर निकृष्ट दर्जाची, नॉन एफएक्यु तुर गे्रडरने पास करून सरकारच्या माथी मारली. खरेदी विक्री संघ किंवा नाफेड या दोन्ही यंत्रणांकडे प्रशिक्षित गे्रडर नाहीत तसेच ग्रेडींगच्या वेळी या दोन्ही यंत्रणांचा जबाबदार अधिकारीही उपस्थित नसतो त्यामुळे शासनाने दोन एजन्सींना ग्रेडींगची जबाबदारी दिली होती. या एजन्सीच्या ग्रेडरने तुरीची खरेदी करताना दुर्लक्ष केले तसेच ही तुर गोदामाता ठेवतांना तेथील ग्रेडरनेही कुठल्या दर्जाची तुर आहे याची तपासणी केली नसल्याचे कालच्या छाप्यातुन अधोरेखीत झाले आहे.ग्रेडींगची तसेच खरेदी केलेली तुर तपासण्याची व्यवस्था तब्बल चार पातळीवर होत असतानाही निकृष्ट तुर खरेदी होत असेल तर भ्रष्टाचाराचे पाणी मुरले आहे हे सांगण्यासाठी पुराव्याची गरज नाही. खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी तुरीतील घोळ चव्हाटयावर आणला आहे आता त्यांनी सरकार दरबारी वजन वापरून या साखळीतील दलाल उघड होईपर्यंत प्रकरण लावून धरले तर भविष्यातील शेतमालाच्या खेरदीमध्ये होणाºया भ्रष्टाचारावर अंकुश बसेल अन्यथा असे झारीतील शुक्राचार्य शेतकºयांपर्यंत लाभाची गंगोत्री पोहचूच देणार नाहीत !

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीSanjay Dhotreसंजय धोत्रे