शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Election 2019 : बाळापूरात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 13:46 IST

अखेर काँग्रेसने या जागेवरील हक्क सोडत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला बहाल केल्याने, काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.

-नितीन गव्हाळे

 अकोला: बाळापूर काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असल्याने, येथून काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांनी लढण्याची तयारी केली होती; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने संग्राम गावंडे यांच्यासाठी बाळापूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे बाळापूर मतदारसंघाबाबत तिढा निर्माण झाला होता. अखेर काँग्रेसने या जागेवरील हक्क सोडत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला बहाल केल्याने, काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेसचे प्रकाश तायडे यांनी गुरुवारी अर्ज भरल्याने येथे बंडखोरीची शक्यता आहे..बाळापूर मतदारसंघ १९६१ ते १९८५ पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. १९९0 मध्ये प्रथमच भाजप येथून विजयी झाली. त्यानंतर लक्ष्मणराव तायडे यांनी पुन्हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला. भाजपचे नारायणराव गव्हाणकर यांनीसुद्धा येथून बाजी मारली होती. लक्ष्मणराव तायडे, गव्हाणकर, सिरस्कार यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरण जुळवून विजय खेचून आणण्याच्या इराद्याने काँग्रेस ताकदीने मैदानात उतरली होती. या मतदारसंघात मुस्लीम, माळी समाजाची निर्णायक मते असल्यामुळे प्रकाश तायडे, नातिकोद्दीन खतिब येथून उमेदवारी आग्रही होते. या इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग केले होते. वंचित बहुजन आघाडी, सेना-भाजप युतीच्या उमेदवारांचेसुद्धा काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. परंतु बुधवारी उशिरा रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांना उमेदवारी जाहिर झाल्याने काँग्रेसला या मतदारासंघावरच पाणी सोडावे लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार प्रकाश तायडे यांनी गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तायडे यांनी दोन वर्षांपासून मतदारसंघाची बांधणी केली होती. गावोगावी सभा घेऊन त्यांनी संपर्क सुरू केला होता; परंतु आघाडीत ही जागा राकाँला गेल्यामुळे काँग्रेसच्या गोटात शांतता पसरली आहे. आता काँग्रेस आघाडी धर्म पाळते की आणखी बंडखोरीची भूमिका घेते. हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

संग्राम गावंडे यांना काढावी लागेल समजूतबाळापूर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संग्राम गावंडे यांना ही जागा सोडल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. निवडणुकीत काँग्रेसची ही नाराजी संग्राम गावंडे यांच्यासाठी लाभाची नाही. त्यासाठी त्यांना काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, नेते, पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागणार आहे. त्यांची समजूत काढावी लागणार आहे.

 

टॅग्स :balapur-acबालापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसAkolaअकोला