शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Maharashtra Assembly Election 2019: हिरपूर सांजापूरवासीयांचा मतदानावरील बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 13:06 IST

उपविभागीय अधिकाºयांनी मागण्या मान्य केल्याने हिरपूर सांजापूर परिसरातील शेतकºयांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिरपूर : हिरपूर सांजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच गावातच साखळी उपोषण सुरू केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकाºयांनी मागण्या मान्य केल्याने हिरपूर सांजापूर परिसरातील शेतकºयांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला आहे.हिरपूर सांजापूर शिवारामध्ये जून-जुलैमध्ये पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने पेरण्या उलटल्या. ज्या शेतांमध्ये पिके निघाली, ती पिके पावसाच्या खंडामुळे सुकली. त्यामुळे हिरपूर शेतशिवार व लगतच्या शिवारातील ९० टक्के जमीन काळी असल्यामुळे खरीप हंगाम हातातून निघून गेला. शेतकºयांनी विविध मागण्यांसाठी ११ आॅक्टोबरपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली होती.तसेच मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचासुद्धा इशारा दिला होता. प्रशासनाने हिरपूर सांजापूर व लगतचा शेतशिवार असा सर्व्हे करून शेतकºयांच्या मागण्या मान्य केल्या. १८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी यांनी उपोषण मंडळाला भेट देऊन हिरपूर सांजापूर व लगतच्या शेतशिवाराचा संपूर्ण सर्व्हे करून शेतकºयांच्या मागण्या मान्य करीत असल्याचे सांगितले. तसेच निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. शेतकºयांनी प्रशासनावर विश्वास ठेवून साखळी उपोषण तसेच निवडणुकीवरील बहिष्काराचा इशारा मागे घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तालुका कृषी अधिकारी काळे, मंडळ अधिकारी देशमुख, तलाठी पांगारकर व कृषी सहायक पवार यांनी भेट दिली. यावेळी संजय फडनाईक, राजू वानखडे, शंकरराव ठाकरे, गणपतराव गुल्हाने, केशवराव देशमुख, रवींद्र दहीकर, उपसरपंच पुरुषोत्तम चारथळ, गोवर्धन कोल्हे, नीलेश गुल्हाने, सदाशिव चारथळ, सुरेश डवंगे, प्रमोद तिहिले, पप्पू हागे, रूपराव ढगे, सुयोग वºहेकर, नीलेश गावंडे, किशोर गुप्ता, अरुण फुलंब्रीकर, दिलीप तिहिले, प्रवीण ढगे व बहुसंख्य शेतकरी या वेळेस उपस्थित होते. (वार्ताहर)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019murtizapur-acमूर्तिजापूरAkolaअकोला