शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजच्या बियाणे उत्पादकांना हमीभावातील फरकाची रक्कम मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:19 IST

अकोला: राज्यातील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन आधारभूत किमतीमधील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष योजना लागू करण्यात आली आहे.

अकोला: राज्यातील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन आधारभूत किमतीमधील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष योजना लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभ्यासपूर्ण माहिती देऊन ही विशेष योजना सुरू करण्याच्या खासदार तथा महाबीजचे संचालक संजय धोत्रे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. यासंदर्भात २८ डिसेंबर रोजी आयोजित महाबीजच्या आमसभेत त्यांचा संचालक, शेतकरी भागधारकांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.महाबीज अकोला व राष्ट्रीय बीज निगम, पुणे यांच्यामार्फत बीजोत्पादक शेतकºयांना त्यांनी उत्पादित केलेल्या पात्र बियाण्यास संबंधित जिल्ह्यातील विहित कालावधीतील दररोजच्या महत्तम भावाचा सरासरी दर अधिक पीक वाण व बियाणे दर्जानिहाय २० ते ३५ टक्के प्रोत्साहनपर रक्कम याप्रमाणे खरेदी धोरण पेरणी हंगामापूर्वी जाहीर करण्यात येते. सद्यस्थितीत महत्तम बाजारभाव हमीभावापेक्षा खूप कमी असून, बीजोत्पादक शेतकरी महामंडळास उत्पादित बियाणे देण्यास तयार नाहीत. त्यामुळे पुढील वर्षी राज्यात विविध बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता होती. या सर्व बाबींचा विचार करून खा. संजय धोत्रे यांनी शेतकºयांना आधारभूत किमतीपेक्षा कोणत्याही परिस्थितीत कमी रक्कम मिळू नये याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर प्रकरणी अभ्यासपूर्वक सादरीकरण केले. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मान्य करण्यात येईल, असे आश्वासन खा. धोत्रे दिले होते. याप्रकरणी तत्कालीन कृषिमंत्री स्व. पांडुरंग फुंडकर तसेच विद्यमान कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच शासनाकडून देय रकमेपोटी आर्थिक तरतूद आवश्यक असल्याने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरीस दुजोरा दिला.खा. संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात सदर प्रस्तावाचा मंत्रालयीन पाठपुरावा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी निरंतर प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून २०१७-१८ च्या उत्पादनापासून राज्यात उत्पादित प्रमाणित व पायाभूत बियाण्यासाठी पीकनिहाय आधारभूत किंमत ही विहित कालावधीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दरांपेक्षा जास्त असल्यास यामधील फरकाची रक्कम महाबीजमार्फत नवीन शेतकºयांना देण्याबाबतची योजना शासनाने लागू केली आहे. शासनाने हमीभाव हे विहित कालावधीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दरापेक्षा जास्त असल्यास यामधील फरकाची रक्कम महाबीज अकोला व राष्ट्रीय बीज निगम, पुणे यांच्यामार्फत बीजोत्पादक शेतकºयांना देण्याबाबतची योजना अमलात आणली आहे. या अंतर्गत खरीप, रब्बी हंगाम २०१७-१८ मध्ये तयार झालेल्या व २०१८-१९ पासून पुढे वेळोवेळी उपलब्ध होणाºया बियाण्यांमधील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकºयांना देण्यासाठी लागू राहील.

-बीजोत्पादकांना होणार फायदा !२०१७-१८ मध्ये  मूग, उडीद, तूर, धान, हरभरा, करडी सोयाबीन व गहू इत्यादी बीजोत्पादकांना या योजनेचा फायदा होणार आहे.  महाबीज कार्यक्षेत्रातील उत्पादित पायाभूत व  प्रमाणित बियाण्यांची मात्रा ३ लाख ४० हजार ३२९ क्ंिवटल असून, २९ जिल्ह्यातील १० हजार २९४ बीजोत्पादक शेतकºयांना फरकाची रक्कम म्हणून सुमारे ३० कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत.  यामध्ये हरभरा व मूग यांना एक हजार रुपये, उडीद पंधराशे रुपये, तूर तेराशे रुपये याप्रमाणे फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. योजना खरीप व रब्बी हंगाम २०१७-१८ मध्ये तयार झालेल्या व २०१८-१९ पासून पुढे वेळोवेळी उपलब्ध  होणाºयांना बियाण्यातील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकºयांना देण्यासाठी लागू राहणार असल्याने बीजोत्पादक शेतकºयांना कायमस्वरूपी लाभ मिळणार आहे, हे या योजनेचे मोठे यश आहे. - शासनाचे आभार मानणार !२८ डिसेंबर २०१८ रोजी  होऊ घातलेल्या महाबीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीजोत्पादक शेतकरी तसेच भागधारकांच्यावतीने शासनाप्रती आभार व्यक्त करण्यासोबतच खा. संजय धोत्रे तथा संचालक महाबीज यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीजSanjay Dhotreसंजय धोत्रे