शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अध्यक्षांच्या गैरहजेरीवर ‘महाबीज’च्या सभेत गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:02 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) सर्वसाधारण सभेला अध्यक्ष तथा कृषी खात्याचे सचिव गैरहजर राहिल्याच्या मुद्यावर  संचालकांसह भागधारक शेतकर्‍यांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बुधवारी ‘महाबीज’च्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ झाला. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली.

ठळक मुद्देसंचालकांसह भागधारक शेतकर्‍यांची तीव्र नाराजी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) सर्वसाधारण सभेला अध्यक्ष तथा कृषी खात्याचे सचिव गैरहजर राहिल्याच्या मुद्यावर  संचालकांसह भागधारक शेतकर्‍यांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बुधवारी ‘महाबीज’च्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ झाला. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली.‘महाबीज’ची सर्वसाधारण सभा ४ ऑक्टोबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ‘महाबीज’चे अध्यक्ष तथा कृषी खात्याचे सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात होती; परंतु सभेला अध्यक्ष तथा कृषी सचिव अनुपस्थित होते. अध्यक्षांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावर महाबीजच्या संचालकांसह भागधारक शेतकर्‍यांनी आक्षेप घेत तीव्र रोष व्यक्त केला. त्यामुळे या मुद्यावरून महाबीजच्या सर्वसाधारण सभेत काही वेळ गोंधळ झाला. यासंदर्भात महाबीजचे संचालक खासदार संजय धोत्रे यांनी अध्यक्ष तथा कृषी सचिव विजय कुमार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली असता, मुंबई येथे महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने, महाबीजच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहता आले नाही, अशी माहिती कृषी सचिवांनी दिली. तसेच सभेला अनुपस्थित राहिल्याबद्दल कृषी सचिवांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कृषी सचिवांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे कृषी आयुक्त एस.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेला महाबीजचे संचालक खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, वल्लभराव देशमुख, तज्ज्ञ संचालक अनिता चोरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्यासह महाबीजचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या सभेत संचालकांसह भागधारक शेतकर्‍यांनी मांडलेल्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

सोयाबीन नुकसान भरपाई अनुदान वाटपातील भ्रष्टाचार गाजला! 

दोन वर्षांपूर्वी महाबीजमार्फत वितरित सोयाबीन बियाण्यापैकी काही ठिकाणी बियाणे उगवले नाही. त्यामुळे संबंधित शेतकर्‍यांना सोयाबीन नुकसान भरपाईपोटी अनुदान वाटप करण्यात आले; मात्र या अनुदान वाटपातील भ्रष्टाचाराचा मुद्दा महाबीजच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. आमदार रणधीर सावरकर यांच्यासह संचालक आणि भागधारक शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत हा मुद्दा मांडला. यासंदर्भात महिनाभरात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश अग्रवाल यांनी सभेत दिले. आपल्यातील दोष किंवा चुकांकडे महाबीजने लक्ष ठेवून आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि कारवाई तातडीने केली पाहिजे, अशी सूचना खा. संजय धोत्रे यांनी यावेळी केली.

१८ नोव्हेंबरला अकोल्यात शेतकर्‍यांशी संवाद साधणार; कृषी सचिवांची ग्वाही!महाबीजच्या सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत, १८ नोव्हेंबर रोजी अकोल्यात येणार असून, महाबीजचे संचालक आणि भागधारक शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहे, अशी ग्वाही महाबीजचे अध्यक्ष तथा कृषी सचिव विजय कुमार यांनी महाबीजच्या संचालकांसह भागधारक शेतकर्‍यांना भ्रमणध्वनीद्वारे बोलताना दिली.

बीजोत्पादक शेतकर्‍यांना अतिरिक्त रक्कम देणार! बीजोत्पादक शेतकर्‍यांना बियाण्याची अतिरिक्त रक्कम देण्याचे महाबीजच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले. त्यामध्ये तूर उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ८00 रुपये, हरभरा बीजोत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ४५0 रुपये, कांदा बीजोत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये अतिरिक्त रक्कम देण्याचे ठरविण्यात आले.

‘महाबीज’च्या सर्वसाधारण सभेला अध्यक्ष तथा कृषी सचिव अनुपस्थित होते. या मुद्यावर सभेत सर्वांनी तीव्र रोष व्यक्त केला; परंतु कृषी सचिव मुंबई येथे आयोजित महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने, ते या महाबीजच्या सभेला उपस्थित राहू शकले नाही. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महाबीजची सभा पार पडली.- खा. संजय धोत्रे,संचालक, महाबीज.