शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अकोला जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 14:12 IST

अकोला : सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणाºया कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केलेली नाही.

ठळक मुद्दे शिकवणी वर्गांमध्ये हजारो विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालये ओस पडलेली दिसून येतात. शिक्षण विभागाकडून कारवाईचा इशारा, कारवाई मात्र शून्य.झाडाझडतीदरम्यान अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना अनुपस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अकोला : सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणाºया कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केलेली नाही.विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नावापुरता प्रवेश घेऊन शिकवणी वर्गांना महत्त्व देतात. कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा प्रवेश क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने तुम्ही केवळ प्रवेश घ्या, उपस्थितीचे आम्ही पाहू, असे सांगत होते. त्यामुळे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना वर्षभर दांडी मारतात आणि परीक्षेच्या तोंडावर केवळ प्रॅक्टिकलपुरते उगवतात. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. शिकवणी वर्गांमध्ये हजारो विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालये ओस पडलेली दिसून येतात. ही बाब माध्यमिक शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्याने शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यंदा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याबाबत बजावले होते. कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना विद्यार्थ्यांची ७० टक्के उपस्थिती नसल्यास त्याला परीक्षेपासून वंचित राहावे लागेल, असा इशारा दिला होता आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थितीची झाडाझडती शिक्षण विभागाने घेण्यास सुरुवात केली खरी; परंतु झाडाझडतीदरम्यान अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना अनुपस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण विभाग नेहमीच विद्यार्थी नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देतो; परंतु पुढे एकाही महाविद्यालयावर शिक्षण विभाग कारवाई करण्याची धमक दाखवित नाही. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयांचे चांगलेच फावत आहे. शिक्षण विभाग केवळ इशारा देतो; परंतु कारवाई करीत नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा निश्चिंत असतात. त्यामुळे आतातरी शिक्षण विभाग कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना विद्यार्थी उपस्थित राहतात की नाही, याचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने पथक नेमले आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना उपस्थिती दिसणार नाही, त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,माध्यमिक विभाग.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक