शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अकोला जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 14:12 IST

अकोला : सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणाºया कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केलेली नाही.

ठळक मुद्दे शिकवणी वर्गांमध्ये हजारो विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालये ओस पडलेली दिसून येतात. शिक्षण विभागाकडून कारवाईचा इशारा, कारवाई मात्र शून्य.झाडाझडतीदरम्यान अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना अनुपस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अकोला : सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणाºया कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केलेली नाही.विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नावापुरता प्रवेश घेऊन शिकवणी वर्गांना महत्त्व देतात. कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा प्रवेश क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने तुम्ही केवळ प्रवेश घ्या, उपस्थितीचे आम्ही पाहू, असे सांगत होते. त्यामुळे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना वर्षभर दांडी मारतात आणि परीक्षेच्या तोंडावर केवळ प्रॅक्टिकलपुरते उगवतात. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. शिकवणी वर्गांमध्ये हजारो विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालये ओस पडलेली दिसून येतात. ही बाब माध्यमिक शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्याने शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यंदा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याबाबत बजावले होते. कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना विद्यार्थ्यांची ७० टक्के उपस्थिती नसल्यास त्याला परीक्षेपासून वंचित राहावे लागेल, असा इशारा दिला होता आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थितीची झाडाझडती शिक्षण विभागाने घेण्यास सुरुवात केली खरी; परंतु झाडाझडतीदरम्यान अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना अनुपस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण विभाग नेहमीच विद्यार्थी नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देतो; परंतु पुढे एकाही महाविद्यालयावर शिक्षण विभाग कारवाई करण्याची धमक दाखवित नाही. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयांचे चांगलेच फावत आहे. शिक्षण विभाग केवळ इशारा देतो; परंतु कारवाई करीत नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा निश्चिंत असतात. त्यामुळे आतातरी शिक्षण विभाग कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना विद्यार्थी उपस्थित राहतात की नाही, याचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने पथक नेमले आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना उपस्थिती दिसणार नाही, त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,माध्यमिक विभाग.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक