शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कमी किंमतीमधील बाष्पकीय शीतक साठवणगृह ठरत आहे किफायतशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:48 IST

ग्रासरूट इनोव्हेटर : भाजीपाला, फळे जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये ते विक्री करावे लागतात.

- राजरत्न सिरसाट (अकोला)

भाजीपाला, फळे जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये ते विक्री करावे लागतात. याच अनुषंगाने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बाष्पकीय शीतक साठवणगृह विकसित केले आहे.

सोप्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या शीतगृहाला दोन एकेरी विटेच्या भिंती बांधल्या असून, त्यामध्ये एक विटेची पोकळी ठेवली आहे. त्याच पोकळीमध्ये विटांचे जाड तुकडे टाकले आहेत. एकेरी विटांची भिंत बांधताना दोन लगतच्या विटांमध्ये ५ ते ४ सें.मी. एवढे अंतर सोडले आहे. जेणेकरू न भिंतीभर हवा खेळती राहावी. भिंत पूर्ण बांधल्यानंतर २० मि.मी. व्यासाचा पीव्हीसी पाईप, त्यावर २ मि.मी.ची छिद्रे करू न दोन एकेरी विटेच्या मधील पोकळी ज्यामध्ये विटांचे तुकडे भरले आहेत, त्यावर ठेवून तोे पाण्याच्या टाकीला जोडला जातो.

या पाईपद्वारे पाणी भिंतीवर सकाळ, दुपार व संध्याकाळी सोडून संपूर्ण भिंत ओली ठेवल्यास बाहेरील भिंतीमधून आतमध्ये येणारी हवा थंड असते. यामुळे अल्पकाळासाठी फळे, भाजीपाला साठवता येतो. विशेष म्हणजे या शीतगृहाची क्षमता संत्राफळासाठी ४ टनापर्यंत आहे. ही पद्धत हाताळण्यास सोपी, सुलभ व शीतगृहाच्या तुलनेत कमी खर्चाची आहे. शीतकालीन तापमान बाहेरील तापमानापेक्षा १४ ते १८ डिग्री सेल्सिअसने कमी आणि सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के मिळते. उन्हाळ्यात संत्र्याची साठवणूक केली असता साधारणत: २० ते २१ दिवस संत्रा चांगला टिकाऊ स्थितीत राहतो. 

हे शीतगृह शेतात, बाजारात इत्यादी ठिकाणी बांधता येते. कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेले बाष्पकीय शीतगृहाचा आकार आवश्यकतेनुसार कमी-जास्त करता येतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी