शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

Lok Sabha Election 2019 : ‘ईव्हीएम’मध्ये दडलंय काय, सांगता येत नाही! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 15:26 IST

‘ईव्हीएम’मध्ये दडलंय काय, हे सांगता येत नाही, अशी शंका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी उपस्थित केली.

अकोला : सोलापूर लोकसभा मतदारसंघात ‘ईव्हीएम’मध्ये बटण कोणतेही दाबा मतदान भारतीय जनता पक्षालाच जात असल्याच्या मतदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या चार ‘ईव्हीएम’ सील करण्यात आल्या आहेत. अकोल्यात मी मतदान केले; पण ‘ईव्हीएम’मध्ये दडलंय काय, हे सांगता येत नाही. कारण कागदावरील चिन्ह पुसल्या जाऊ शकते, अशी शंका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तथा अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी उपस्थित केली.अ‍ॅड.आंबेडकर यांनी कृषी नगरातील पोदार इंटरनॅशनल हायस्कूलमधील मतदान केंद्रावर दुपारी ४.१० वाजताच्या दरम्यान मतदान केले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. सोलापूरमध्ये चार मशीन सील करण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल बाहेर आल्यावर खरे काय ते कळेल, असे सांगताना त्यांनी अकोल्यातही मतदान केल्यानंतर मला माझे छायाचित्र व निशाणी दिसली; परंतु पेट्रोल पंपावर जी पावती मिळते, त्या पावतीवरील अक्षरे काही वेळात पुसली जातात. म्हणूनच ‘ईव्हीएम’, ‘व्हीव्हीपॅट’च्या निशाणी व अक्षरांच्या बाबतीत त्यांनी शंका व्यक्त केली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा मतदार केंद्रावर एका मतदाराने मतदान यंत्राऐवजी मतपेटीतून मतदान घ्यावे, या मागणीसाठी ‘ईव्हीएम’ फोडले. हीच मतदारांची खरी प्रतिक्रिया असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. अकोल्यात तिरंगी नव्हे, तर सप्तरंगी निवडणूक असल्याचे उपरोधिकपणे बोलताना मतमोजणीनंतर चित्र स्पष्टच होईल. त्यामुळे २३ मेपर्यंत प्रतीक्षा करा असे ते म्हणाले.सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी एका हॉटेलात भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सुशीलकुमार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने त्यांनतर कॉमेन्टस् करणे अशोभनीय असल्याचे ते म्हणाले. प्रज्ञा सिंग यांना भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या प्रश्नादाखल त्यांनी राष्टÑीय स्वयंसेवक संघ ही आतंकवादी संघटना असून, प्रज्ञा सिंग यांच्यावर गुन्हे आहेत.असे असताना उमेदवारी दिली. कारण संघ दहशतवादी संघटना आहे, हे सर्व जगाला माहीत आहे. संघाकडे असणारी शस्त्रे हेच अधोरेखित करते. संघाला लोकशाही नकोय म्हणून जेथे संधी मिळाली तेथे संघ दहशतवादी कारवाया करते. कोणतही धर्म दहशतवादी नसतो. तथापि, आपल्या कारवायांवर पांघरू ण घालण्यासाठी संघ हिंदू नाव पुढे करतो, असा आरोपही त्यांनी केला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर