शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

Lok Sabha Election 2019:विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:18 IST

वर्धेत काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर राष्टÑवादीने बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही, हे स्पष्टच होत आहे.

राजेश शेगोकार,अकोला: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातून विस्तारत विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले होते. स्वाभिमानीचे राष्टÑीय अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी वर्धेतून विदर्भ मोहिमेची सुरुवात करून काँग्रेस आघाडीत सहभागी होण्याकरिता वर्धा व बुलडाणा या लोकसभा मतदारसंघांवर दावा केला होता; मात्र त्यांच्या वाट्याला विदर्भातील एकही जागा येण्याची शक्यता नाही. वर्धेत काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर राष्टÑवादीने बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही, हे स्पष्टच होत आहे.स्वाभिमानीने काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सहा जागांचा प्रस्तावही औपचारिक स्वरूपात दिला होता. त्यामध्ये हातकणंगले, माढा व विदर्भातील वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांवर त्यांची सर्वाधिक मदार होती. या चार जागांपैकी हातकणंगलेची जागा राष्टÑवादीने शेट्टींसाठी सोडली आहे, तर माढासाठी राष्ट्रवादीतच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे सुबोध मोहितेंसाठी वर्धा व रविकांत तुपकरांसाठी बुलडाणा या दोन जागा निश्चितच मिळाव्यात, हा स्वाभिमानीचा आग्रह होता. या दोन मतदारसंघांसाठी माध्यमातून स्वाभिमानीला विदर्भात राजकीयदृष्ट्या आपली ताकद वाढवायची आहे; मात्र वर्ध्याच्या जागेवर काँग्रेसच्या चारूलता टोकस यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गुरुवारी बुलडाण्यात राष्टÑवादीने डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केल्यामुळे स्वाभिमानीचा विदर्भातील दावा जवळपास संपुष्टात आला आहे. तुपकर हे स्वाभिमानीचा विदर्भातील चेहरा असून, सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी सोडल्यानंतर संघटनेत शेट्टींनंतरचे स्थान त्यांना मिळाले होते. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाचीही जबाबदारी टाकण्यात आली होती, तर सुबोध मोहितेंच्या रूपाने स्वाभिमानीला आणखी एक चेहरा पूर्व विदर्भात मिळाला होता; मात्र या दोघांनाही अपेक्षित असलेला मतदारसंघ मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याने आता त्यांच्या भूमिका काय राहतील, यावरही स्वाभिमानीचे विदर्भातील भविष्य ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliticsराजकारणRavikant Tupkarरविकांत तुपकर