शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2019 : राज्यातील २५ मतदारसंघात गाजणार शेतकरी समस्यांचे मुद्दे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:26 IST

अकोला: लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत, असे मत कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- संतोष येलकर

अकोला: लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत, असे मत कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.राज्यातील दुष्काळग्रस्त किमान २५ लोकसभा मतदारसंघात सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिष्य असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांसाठी छावण्या आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे थंड बस्त्यात असून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्यानुषंगाने दुष्काळी परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस, सोयाबीन व डाळींच्या कमी झालेल्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांच्या नाराजीतून लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो, असा अंदाज तिवारी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघात कर्जमाफी, शेतीमालाचे भाव, दुष्काळी मदत यासह शेतकºयांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.शेतकरी-शेतमजुरांचे स्थलांतर; मतदानात होणार घट?दुष्काळी परिस्थितीत राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांचे शहरांमध्ये स्थलांतर होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या मतदानाच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता आहे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या किमान २५ मतदारसंघात शेतमालाचे हमी भाव, कर्जमाफी, दुष्काळी मदत व इतर शेतकºयांच्या समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या समस्या राज्यकर्त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.-किशोर तिवारीअध्यक्ष, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन

 

टॅग्स :akola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणKishor Tiwariकिशोर तिवारीAkolaअकोलाFarmerशेतकरी