शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Lok Sabha Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी केला एअर स्ट्राइकचा उदोउदो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:15 IST

देशाचे भविष्य घडविणारी निवडणूक असून, त्याकरिता मोदी हेच सक्षम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश व देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे. पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देण्यासाठी मोदींनी एअर स्ट्राइक केले व देशाचा आत्मसन्मान वाढविला; मात्र या कारवाईचेही विरोधक पुरावे मागत असून, त्यांच्या जाहीरनाम्यात राष्टÑद्रोहाचे कलम रद्द करण्याची घोषणा करीत आहेत. ही निवडणूक गल्लीतली निवडणूक नाही, तर देशाचे भविष्य घडविणारी निवडणूक असून, त्याकरिता मोदी हेच सक्षम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी तेल्हाºयात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. संजय धोत्रे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी एअर स्ट्राइकच्या मुद्यावर विरोधकांना धारेवर धरले. जगात देशाचा सन्मान वाढत असताना विरोधकांना मात्र राष्टÑद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन द्यावे लागते, हे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. देशातील गरिबीविरुद्ध नरेंद्र मोदी हेच खरी लढाई लढत असून, केंद्रातून निघणारा एक रुपया कोणत्याही दलालीशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात आता जमा होत आहे, असा दावाही त्यांनी केला. आ. प्रकाश भारसाकळे यांनी प्रास्ताविक केले.दिल्लीचा हाच मार्गतेल्हाºयात मुख्यमंत्र्यांची सभा घेण्याचे कारण म्हणजे पहिल्या सभेचे टोक व या सभेचे टोक उत्तर दिशेने असून, दिल्लीला जाण्याकरिता हाच मार्ग आहे, असे संजय धोत्रे यांनी म्हणताच एकच हशा पिकला.अन् महिला पोलीस कर्मचाºयाची प्रकृती बिघडलीमुख्यमंत्री यांचे भाषण सुरू असताना एका महिला पोलिसाला चक्कर आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाणी द्या, असे म्हणून आपले भाषण थांबविले. त्यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटीलसह इतर अधिकारी व मंचावरील मान्यवर त्या दिशेने धावले. त्या महिलेला बरे वाटत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले उर्वरित भाषण पूर्ण केले.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत ‘शिवसंग्राम’चाही सहभागभाजपा, शिवसेना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामने अकोल्यात युतीच्या प्रचारापासून दूर राहण्यातच धन्यता मानली होती. मुख्यमंत्र्यांनी तेल्हाऱ्यात सोमवारी घेतलेल्या प्रचार सभेत शिवसंग्रामचे अकोल्यातील नेते संदीप पाटील यांनी उपस्थिती दर्शवित या दोन पक्षातील दुरावा संपल्याचे संकेत दिले.विनायक मेटे यांच्या नेतृत्वातील शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्तेही अकोल्यात युतीच्या प्रचारापासून दूरच दिसत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटावरून झालेल्या राजकारणामुळे अकोल्यात शिवसंग्राम आणि खासदार गटामध्ये निर्माण झालेली दरी पुढच्या पाच वर्षात रुंदावली आहे. या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी विनायक मेटे यांनी नागपुरात मेळावा घेऊन युती धर्म पाळला आहे; मात्र अकोल्यात शिवसंग्राम प्रचारातून गायबच होते. सोमवारी या दोन पक्षातील दरी संपल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Dhotreसंजय धोत्रेBJPभाजपा