शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

Lok Sabha Election 2019 : आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाची परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 13:07 IST

अकोला : अकोला हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गत १५ वर्षांपासून भाजपाचे संजय धोत्रे खासदार असून, आता ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. या मतदारसंघात २०१४ च्या लढतीची पुनरावृत्ती आहे.

- राजेश शेगोकार अकोला : अकोला हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गत १५ वर्षांपासून भाजपाचे संजय धोत्रे खासदार असून, आता ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. या मतदारसंघात २०१४ च्या लढतीची पुनरावृत्ती आहे. काँग्रेसने गेल्यावेळी पराभूत झालेले हिदायत पटेल यांनाच पुन्हा एकदा बोहल्यावर चढविले आहे, तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यावेळी वंचित बहुजन आघाडीचा नवा प्रयोग घेऊन मैदानात आहेत. धोत्रे यांची मतदारसंघावर पकड मजबूत असून, प्रत्येक गावात त्यांचे स्वतंत्र ‘नेटवर्क’ आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व त्यांच्यामध्ये असलेल्या वैमनस्यामुळे पक्षाच्या कामगिरीवर फरक पडलेला नाही, ही त्यांच्या जमेची बाजू आहे; मात्र २०१४ ची मोदी लाट आता नाही. धोत्रे यांच्या विरोधात सुप्त अशी नकारात्मक लाट आहे. त्यामुळेच यावेळी त्यांनी विकासाचा मुद्दा समोर केला आहे. गेल्या तीन दशकांतील निवडणुकांंचा मागोवा घेतला तर भाजपाचा विजय हा मतविभाजनाच्या ‘फॅक्टर’मुळे फारच सुकर होतो, हे अधोरेखित होते. १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यामध्ये आघाडी झाल्याने मतविभाजन टळले व भाजपाला थांबविता आले. यावेळी मतविभाजनाचेच गणित पुन्हा एकदा मांडले जात आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी दलित, ओबीसी, मुस्लीम, आदिवासी अशा वंचितांचा जागर करीत भारिप-बमसंला थेट वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्याचे धाडस केले आहे, शिवाय एमआयएमला सोबत घेतले आहे. या समीकरणांमुळे काँग्रेसचीच मतपेढी धोक्यात आहे. त्यामुळेच धोत्रे यांना शह देतानाच काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकर यांच्यावरही मात करायची असल्याने पटेल यांना उमेदवारी देऊन अ‍ॅड. आंबेडकरांचीच कोंडी केली आहे. ही कोंडी फोडून मागील मतांच्या तुलनेत त्यांची उडी किती उंच जाते, यावरच त्यांच्या प्रयोगाच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरणार आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक अकोल्यासाठी नव्या विक्रमांची नोंद करणारी ठरणार आहे. खासदार धोत्रे यांनी यावेळी विजय मिळविला तर ते या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा जिंकणारे पहिलेच खासदार ठरतील. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर जिंकले तर काँग्रेसला सोबत न घेता विजयी होण्याचा विक्रम करतील. हिदायत पटेल विजयी झालेच तर तब्बल तीन दशकांनंतर काँग्रेसला यश मिळेल. त्यामुळे विजय कोणाचाही झाला तरी अकोल्यासाठी विक्रम ठरलेलाच आहे.

आम्ही विकासावर भर दिला आहे. अनेक योजना राबविल्या असून, काही कामे पूर्णत्वास तर काही प्रगतीत आहेत. सिंचन, शेती, रस्ते, पाणी, स्वच्छतेसोबतच ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाचीही नाराजी नाही. सर्वांना सोबत घेतले आहे.- संजय धोत्रे, भाजपा.

काँग्रेस-आघाडीसोबत माझी लढतच नाही. भाजपा-शिवसेना युतीसोबत लढाई आहे. राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविणाऱ्या भाजपाच्या विरोधात ‘वंचितांनी’ रणशिंग फुंकले आहे. प्रचाराच्या दरम्यान लोकांमधील रोष दिसून येतो. त्यामुळे ही लढाई परिवर्तनाची लढाई आहे.- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, ‘वंचित’

  • कळीचे मुद्दे
  • सलग तिसऱ्यांदा खासदार असल्याने अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी मोडून काढण्यासाठी भाजपा विकासाचा मुद्दा घेऊन रिंगणात आहे.
  • काँग्रेसने मुस्लीम उमेदवार देऊन अ‍ॅड. आंबेडकरांची केलेली कोंडी तर दुसरीकडे ओबीसी, मुस्लिमांचा जागर करण्यावर वंचितचा भर.
टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Dhotreसंजय धोत्रेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक