शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ‘लॉकडाऊन रिटर्न्स’; व्यापार क्षेत्रात संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 10:18 IST

लॉकडाऊन रिटर्न्स कसा राहणार, या बाबत शहरातील उद्योग, व्यापर क्षेत्रात संभ्रमाची स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील कोरोनाबधितांची संख्या आता २ हजारांच्या उंबरठ्यावर तर मृत्यूची संख्या शतकाच्या जवळ आली असून, विदर्भातील हॉटस्पॉट म्हणून अकोल्याची ओळख झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यभरातील मोठ्या शहरांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची सुरुवात केल्यानंतर शनिवारी पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यातही येत्या १८ ते २० जुलैदरम्यानच्या तीन दिवसात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वी १ ते ६ जूनपर्यंत ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय जाहीर झाल्यानंतरही हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन रिटर्न्स कसा राहणार, या बाबत शहरातील उद्योग, व्यापर क्षेत्रात संभ्रमाची स्थिती आहे.अकोल्यात गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत गेलेली कोविड-१९ रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. काही बंधने पाळून आणि दिशानिर्देशाचे पालन करून नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करण्याची मुभा दिली. जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये, असेही राज्य शासनाने म्हटले होते; मात्र राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिकेने दिलेल्या दिशानिर्देशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे सातत्याने दिसून आले. त्यामुळेच अकोल्यासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. या पृष्ठभूमीवर अकोल्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

सावरणाऱ्या उद्योग क्षेत्राला ब्रेकअकोला एमआयडीसी ही पश्चिम वºहाडातील सर्वात मोठे उद्योगक्षेत्र आहे. लॉकडाऊन काळातही परवानगी देण्यात आलेले काही उद्योग सुरू होते. आता अ‍ॅनलॉकनंतर मजुरांची चणचण जावत आहे. त्यामुळे दाल मिल, आॅइल मिल यासह लहान-मोठे ६0 टक्के उद्योग सुरू झाले आहेत. पुन्हा मोठे लॉकडाऊन झाल्यास उद्योगक्षेत्राला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

रविवारचा बंद अन् सम-विषमचा फटका४१८ ते २० दरम्यान जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये रविवारचा दिवस येतो. रविवारी तसेही अकोल्यातील अर्धेधिक व्यवसाय बंद असतात. त्यातच आता सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याचे बंधन असल्याने या तीन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे काही व्यावसायिकांची दुकाने चार ते पाच दिवस बंद राहू शकतात.

विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली!अनेक जण विनाकारण शहरात फिरत आहे. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चार चाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे. परिणामी आता कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे पोलीस, मनपाच्या यंत्रणेने केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते. शुक्रवार, शनिवार या दोन दिवसात ७६० जणांवर गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख ६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तीन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटेल का?रुग्णवाढीचा वेग हा अकोला शहरासह ग्रामीण भागातही झपाट्याने होत आहे. शहर व ग्रामीण भागात लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढले. त्यामुळे तीन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरेच कोरोनाची साखळी तुटेल का, याबाबतही संभ्रम व्यक्त केला जात आहे. खरे तर लॉकडाउन हा एक मार्ग आहे; मात्र तो एकमेव मार्ग नाही. आताच्या गंभीर परिस्थितीवर मृत्यूदर कमी करणे व रुग्णांना सुविधा देणे यावर भर हवा, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डॉक्टर म्हणतात...आताच्या स्थितीत तीन दिवसांच्या लॉकडाऊनचा फारसा फरक पडणार नाही, लॉकडाऊन ही प्राथमिक स्तरावरची उपायोजना होती. आता टेस्ट वाढविणे व जीएमसीवर रुग्णांचा विश्वास बसेल, अशा सुविधा पुरविण्याची गरज आहे. बैदपुºयामध्ये प्रत्यक्ष काम केल्यावर मी या निष्कर्षाप्रत पोहचलो आहे.- डॉ. जिशान हुसेन,फिजिशियनखूप असा फरक पडणार नाही; पण थोडा दिलासा मिळू शकतो. खरे तर नागरिकांची जबाबदारी आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल, तर नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा आणि नियमित हात धुवावे.- डॉ. समीर लोटे,फुप्फुस विकार तज्ज्ञ, अकोलाअनलॉकनंतर आता हळूहळू व्यापार सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. या घोषणेबाबत सध्या चेंबरच्या सदस्यांसोबत चर्चा सुरू आहे. लॉकडाऊन कसा असला पाहिजे, याबाबत सदस्यांकडून सूचना मागितल्या आहेत. येत्या दोन दिवसात या सूचनांनुसार प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेऊ. चेंबरने नेहमीच प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतली आहे.- राजकुमार बिलाला,अध्यक्ष विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सविदर्भातून कोरोनाचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण अकोला जिल्ह्यासह शहरात आढळून येत आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य नसल्यामुळे की काय, अवघ्या तीन दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची हास्यास्पद घोषणा करण्यात आली. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्यासह किमान १० ते १२ दिवसांचा कडकडीत बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. परिस्थिती लक्षात घेता ‘लॉकडाऊन’च्या निर्णयावर शंका उपस्थित होत आहेत. याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होत आहे.- रमेश कोठारी अध्यक्ष, होलसेल अ‍ॅण्ड रिटेल रेडिमेड होजियरी

 

 

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक