शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

Lockdown : परप्रांतीयांना घराची ओढ; भर उन्हात पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 10:02 IST

भर उन्हात परराज्यातील नागरिक शेकडो किलो मीटर अंतर पायी चालत कुटुंबासह शहरात दाखल होत आहेत.

अकोला : जीवघेण्या संसर्गजन्य कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे. केंद्र शासनाने जाहिर केलेल्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब व मजूर वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. घराची ओढ असल्यामुळे भर उन्हात परराज्यातील नागरिक शेकडो किलो मीटर अंतर पायी चालत कुटुंबासह शहरात दाखल होत आहेत. काही क्षण विश्रांती घेतल्यावर संबंधित नागरिक त्यांच्या राज्याकडे अक्षरश: पायी चालत रवाना होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.कोरोना विषाणूची साखळी खंडित व्हावी या उद्देशातून केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदीची मुदत वाढवली. राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद,नाशिक,नागपूर आदी मोठ्या शहरांमध्ये परराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तेलंगाना, मध्यप्रदेश,छत्तीसगढ, पश्चिम बंगाल,बिहार, उत्तर प्रदेशमधील गरजू नागरिकांची मोठी संख्या आहे. टाळेबंदी जाहिर होताच सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे हाताला काम नसल्याने परराज्यातील नागरिकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कशाही परिस्थितीत स्वत:च्या गावी निघून जाण्याची ओढ निर्माण झालेल्या या नागरिकांनी चक्क पायी चालण्याचा पर्याय शोधला.केंद्र व राज्य सरकारने अशा नागरिकांची घरी जाण्याची व्यवस्था केली असली तरी जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागत असल्याची परिस्थिती आहे. शिवाय संवाद साधण्यासाठी भोषेची अडचण येत असल्यामुळे परराज्यातील नागरिकांनी पायी चालत जाण्याला प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून परराज्यातील नागरिकांचे जत्थे त्यांच्या मुळ गावाकडे रवाना होत असल्याचे दिसत आहे.यावेळी कुटुंबातील महिला, लहान मुले भरउन्हात पायी चालत असल्याचे चित्र आहे.परराज्यातील नागरिकांची मनपाकडून तपासणीआंध्र प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, बिहार तसेच उत्तर प्रदेशकडे जाणाºया मजूर वर्गाची मोठी संख्या पहावयास मिळत आहे. महापालिका क्षेत्रात दाखल होणाºया संबंधित नागरिकांची जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाकडून नोंद करीत आरोग्य तपासणी केली जात आहे.डोक्यावर ओझे,हातात पाण्याची बॉटलदिवसभर प्रवास करणाºया परप्रांतीय नागरिकांच्या डोक्यावर ओझे,हातात पाण्याची बॉटल एवढेच साहित्य दिसून येते. रात्री महामार्गालगतच्या शेतामध्ये मुक्काम करून दुसºया दिवशी पहाटेच गावाकडे रवाना होतो. यादरम्यान,काही गावांमध्ये नागरिक किंवा प्रशासनाच्यावतीने जेवणाची तात्पुरती सोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगार