शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

चला नागपूर, चला औरंगाबाद...आवाज देऊन बोलावताहेत प्रवाशांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 10:26 IST

Akola News : निर्बंध शिथिल झाल्याने प्रवासी संख्या वाढण्याची अपेक्षा होती; परंतु काहीच मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.

अकोला : निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर एसटीची प्रवासी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे; परंतु बहुतांश फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळे बसच्या चालक-वाहकांवर प्रवाशांना आवाज देऊन बोलावण्याची वेळ आली आहे.कोरोनामुळे बंद असलेली एसटीची प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. हळूहळू प्रवासी संख्याही वाढत आहे. त्यानुसार बसेसच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सद्यस्थितीत आगार क्रमांक २ मधून ३० बस सोडण्यात येत आहेत. यामध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याच्या फेऱ्या आहेत. जवळपास ३० टक्के बस अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद व प्रवासी नसल्याने ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या अद्याप बंद आहेत. निर्बंध शिथिल झाल्याने प्रवासी संख्या वाढण्याची अपेक्षा होती; परंतु काहीच मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.

आगाराचे उत्पन्न केवळ पावणेतीन लाख

कोरोना काळाआधी येथील आगार क्रमांक २ चे उत्पन्न चांगले होते. जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक असल्याने येथे प्रवाशांची वर्दळही असते; मात्र आता या आगाराचे उत्पन्न घटले आहे. दररोज केवळ २ लाख ७५ हजार रुपयांच्या जवळपास उत्पन्न होत आहे.

 

आगारातील एकूण बस- ५२

सोडण्यात येणाऱ्या बस - ३२

सध्या होत असलेल्या फेऱ्या - ९०

 

निर्बंधामध्ये शिथिलता मिळाली, पण...

राज्य सरकारने काही जिल्ह्यामध्ये निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. त्यामुळे दळणवळण आणखी वाढणार आहे. यामुळे एसटी महामंडळाला फायदा होण्याची शक्यता आहे; मात्र तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढली आहे.

शिवशाही रिकाम्याच!

दुसऱ्या लाटेनंतर आता एसटी बस आणि खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत; परंतु तिसऱ्या लाटेच्या भीतीने प्रवासी एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला प्रतिसाद मिळत नाही. सध्या अमरावती, औरंगाबाद मार्गावर शिवशाही बस आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटीAkola Bus Standअकोला बस स्थानक