शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलच्यामाध्यमातून मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे द्या !

By admin | Updated: January 30, 2016 02:18 IST

काशी (वाराणसी) पीठाचे जगद्गुरू यांचा सल्ला.

धनंजय कपाले/वाशिम: तंत्रज्ञानाचा वापर करायलाच हवा. त्यापासून दूर राहून चालणार नाही; मात्र तरुण पिढी किंवा लहान मुलांच्या हाती मोबाइल देताना पालकांनी त्यांना विशेष सूचना दिल्या पाहिजेत. मोबाइलमध्ये संस्कृतीची माहिती असलेले अनेक अँप्स आहेत तसेच संस्कृतसबंधी माहिती असणार्‍या अनेक वेबसाइट आहेत. त्या मुलांच्या मोबाइलमध्ये टाकून त्यांना त्याद्वारे आपल्या संस्कृतीशी अवगत करणे गरजेचे आहे. यामुळे संस्कृतीचे रक्षणही होईल आणि मुले तंत्रज्ञानापासून दूरही जाणार नाहीत, असे मत काशी (वाराणसी) पीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले. ते वाशिम तालुक्यातील काटा येथे शिवनाम सप्ताहाच्या कार्यक्रमनिमित्त आले होते. प्रश्न : सध्या अनेक जण देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत आहेत.-चार-दोन लोकांच्या म्हणण्याने देशामध्ये असहिष्णुता पसरली, असे ठरविणे चुकीचे आहे. काही ठरावीक लोकांनीच हा आरोप केला आहे. त्यांची पृष्ठभूमी तपासणे गरजेचे आहे. प्रश्न : देशातील धार्मिक वाद टाळण्यासाठी काय करता येईल? -देशामध्ये धार्मिक वाद मुळीच नाहीत. भारत देश हा विश्‍वसंस्कृतीचे उगमस्थान आहे. जागतिक स्तरावर मानवाने केलेल्या संशोधनांचा विचार केल्यास, त्यात भारताचा सिंहाचा वाटा आहे. भारताने जगाला अध्यात्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, अवकाश विज्ञान, ज्योतिषशास्त्र, दर्शनशास्त्र, गणित अशा असंख्य क्षेत्रात अमूल्य आणि एकमेव योगदान दिले आहे. आपल्या देशात ऋषी-मुनींच्या काळापासून सर्वधर्म समभावाची संस्कृती रुजलेली आहे. आजही सर्वधर्म समभावाची संस्कृती टिकून आहे.प्रश्न : राम मंदिर निर्माण करण्याबाबत आपले काय मत आहे?-राम मंदिर निर्माण करण्यासाठी सध्या जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. राम मंदिराच्या जागेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने यावर भाष्य करणे ठीक नाही. मंदिराच्या जागेबाबत न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. न्यायालयाचा निर्णय ऐकण्यासाठी सर्व देश आतुर होऊन बसला आहे. लवकरच निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे. प्रश्न : संस्कृत भाषा टिकविण्यासाठी काय करता येईल ?-संस्कृत ही एक ऐतिहासिक भाषा असून, ती पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून, ती भारताच्या २३ शासकीय राजभाषांपैकी एक आहे. संस्कृतमधील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृत भाषा टिकण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी तो विषय शिकण्याचा आग्रह केला पाहिजे. प्रश्न: विद्यमान शासनाच्या ध्येयधोरणाबद्दल आपले काय मत आहे? -विकासाचे ध्येय घेतलेल्या आणि कुटुंबाचा मोह त्यागून देशसेवा करणार्‍या पंतप्रधान मोदींसारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या हाती देशाची सत्ता आली आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला नक्कीच गती मिळणार आहे. कठोर परिश्रम, राष्ट्रसर्मपक भावना आणि नि:स्वार्थी सेवा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे देशास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, असा मला विश्‍वास आहे.