शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

मोबाइलच्यामाध्यमातून मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे द्या !

By admin | Updated: January 30, 2016 02:18 IST

काशी (वाराणसी) पीठाचे जगद्गुरू यांचा सल्ला.

धनंजय कपाले/वाशिम: तंत्रज्ञानाचा वापर करायलाच हवा. त्यापासून दूर राहून चालणार नाही; मात्र तरुण पिढी किंवा लहान मुलांच्या हाती मोबाइल देताना पालकांनी त्यांना विशेष सूचना दिल्या पाहिजेत. मोबाइलमध्ये संस्कृतीची माहिती असलेले अनेक अँप्स आहेत तसेच संस्कृतसबंधी माहिती असणार्‍या अनेक वेबसाइट आहेत. त्या मुलांच्या मोबाइलमध्ये टाकून त्यांना त्याद्वारे आपल्या संस्कृतीशी अवगत करणे गरजेचे आहे. यामुळे संस्कृतीचे रक्षणही होईल आणि मुले तंत्रज्ञानापासून दूरही जाणार नाहीत, असे मत काशी (वाराणसी) पीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले. ते वाशिम तालुक्यातील काटा येथे शिवनाम सप्ताहाच्या कार्यक्रमनिमित्त आले होते. प्रश्न : सध्या अनेक जण देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत आहेत.-चार-दोन लोकांच्या म्हणण्याने देशामध्ये असहिष्णुता पसरली, असे ठरविणे चुकीचे आहे. काही ठरावीक लोकांनीच हा आरोप केला आहे. त्यांची पृष्ठभूमी तपासणे गरजेचे आहे. प्रश्न : देशातील धार्मिक वाद टाळण्यासाठी काय करता येईल? -देशामध्ये धार्मिक वाद मुळीच नाहीत. भारत देश हा विश्‍वसंस्कृतीचे उगमस्थान आहे. जागतिक स्तरावर मानवाने केलेल्या संशोधनांचा विचार केल्यास, त्यात भारताचा सिंहाचा वाटा आहे. भारताने जगाला अध्यात्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, अवकाश विज्ञान, ज्योतिषशास्त्र, दर्शनशास्त्र, गणित अशा असंख्य क्षेत्रात अमूल्य आणि एकमेव योगदान दिले आहे. आपल्या देशात ऋषी-मुनींच्या काळापासून सर्वधर्म समभावाची संस्कृती रुजलेली आहे. आजही सर्वधर्म समभावाची संस्कृती टिकून आहे.प्रश्न : राम मंदिर निर्माण करण्याबाबत आपले काय मत आहे?-राम मंदिर निर्माण करण्यासाठी सध्या जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. राम मंदिराच्या जागेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने यावर भाष्य करणे ठीक नाही. मंदिराच्या जागेबाबत न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. न्यायालयाचा निर्णय ऐकण्यासाठी सर्व देश आतुर होऊन बसला आहे. लवकरच निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे. प्रश्न : संस्कृत भाषा टिकविण्यासाठी काय करता येईल ?-संस्कृत ही एक ऐतिहासिक भाषा असून, ती पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून, ती भारताच्या २३ शासकीय राजभाषांपैकी एक आहे. संस्कृतमधील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृत भाषा टिकण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी तो विषय शिकण्याचा आग्रह केला पाहिजे. प्रश्न: विद्यमान शासनाच्या ध्येयधोरणाबद्दल आपले काय मत आहे? -विकासाचे ध्येय घेतलेल्या आणि कुटुंबाचा मोह त्यागून देशसेवा करणार्‍या पंतप्रधान मोदींसारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या हाती देशाची सत्ता आली आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला नक्कीच गती मिळणार आहे. कठोर परिश्रम, राष्ट्रसर्मपक भावना आणि नि:स्वार्थी सेवा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे देशास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, असा मला विश्‍वास आहे.