शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षीचे कर्ज भरावेच लागणार!

By admin | Updated: June 29, 2017 00:44 IST

तरच मिळणार कर्जमाफीचा लाभ!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्षांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानुसार, लाभार्थी ठरण्यासाठी गेल्यावर्षी म्हणजेच २०१६-१७ या वर्षात घेतलेले पीक कर्ज व्याजासह भरावेच लागणार आहे. त्याशिवाय चालू वर्षासाठी बँका कर्ज देणारच नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे या कर्जमाफीचा थेट लाभ म्हणजे चालू वर्षात कर्ज मिळण्यापासून शेतकरी वंचित राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावासाठी राज्यभरात आंदोलनाचे मोहोळ उठले. त्यामुळे दोलायमान झालेल्या शासनाने का-कू करीतच कर्जमाफीचा निर्णय घेतला. आधी घेतलेल्या निर्णयात तत्त्वत:, निकष आणि सरसकट या शब्दांचा खेळ केल्याने पुन्हा आंदोलनाची भाषा सुरू झाली. त्यानंतर २८ जून रोजी शासनाने कर्जमाफीच्या निर्णयात काही मुद्दे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यातून अनेक मुद्दे निर्माणही झाले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे, ज्या कारणासाठी कर्जमाफीची मागणी पुढे आली, त्यातील प्रमुख असलेली सात-बारा कोरा करणे, ही मागणी डावलण्यात आल्याचे दिसत आहे. ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेले दीड लाखांच्या मर्यादेपर्यंतचे कर्ज शासन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्याचवेळी थकबाकीची रक्कम त्यापेक्षा अधिक असल्यास ती भरल्यानंतरच शासनाकडून कर्जमाफीची रक्कम मिळणार आहे. दुसरे म्हणजे, कर्ज पुनर्गठित केलेल्या शेतकऱ्यांचे ३० जून २०१६ पर्यंतचे थकीत कर्ज ठरलेल्या मर्यादेत शासन भरणार आहे; मात्र त्याचवेळी पुनर्गठनानंतर २०१६-१७ या वर्षासाठी घेतलेले नवे कर्ज परतफेड केल्यासच कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे चालू वर्षाचे कर्ज भरल्याशिवाय बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी उभे करणारच नाहीत, हेही आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्षात सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हातात पडणारच नसल्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जातील किमान ४० टक्के रक्कम बँकांमध्ये भरावी लागणार आहे.शासन निर्णयातील काही मुद्यांवर स्पष्ट निर्देश मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचणी असल्यास बदल करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठित होणार आहे. ती समिती सहा महिन्यांपर्यंत त्यामध्ये दुरुस्ती सुचवणार आहे. - जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.