शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

गेल्या वर्षीचे कर्ज भरावेच लागणार!

By admin | Updated: June 29, 2017 00:44 IST

तरच मिळणार कर्जमाफीचा लाभ!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्षांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानुसार, लाभार्थी ठरण्यासाठी गेल्यावर्षी म्हणजेच २०१६-१७ या वर्षात घेतलेले पीक कर्ज व्याजासह भरावेच लागणार आहे. त्याशिवाय चालू वर्षासाठी बँका कर्ज देणारच नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे या कर्जमाफीचा थेट लाभ म्हणजे चालू वर्षात कर्ज मिळण्यापासून शेतकरी वंचित राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावासाठी राज्यभरात आंदोलनाचे मोहोळ उठले. त्यामुळे दोलायमान झालेल्या शासनाने का-कू करीतच कर्जमाफीचा निर्णय घेतला. आधी घेतलेल्या निर्णयात तत्त्वत:, निकष आणि सरसकट या शब्दांचा खेळ केल्याने पुन्हा आंदोलनाची भाषा सुरू झाली. त्यानंतर २८ जून रोजी शासनाने कर्जमाफीच्या निर्णयात काही मुद्दे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यातून अनेक मुद्दे निर्माणही झाले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे, ज्या कारणासाठी कर्जमाफीची मागणी पुढे आली, त्यातील प्रमुख असलेली सात-बारा कोरा करणे, ही मागणी डावलण्यात आल्याचे दिसत आहे. ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेले दीड लाखांच्या मर्यादेपर्यंतचे कर्ज शासन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्याचवेळी थकबाकीची रक्कम त्यापेक्षा अधिक असल्यास ती भरल्यानंतरच शासनाकडून कर्जमाफीची रक्कम मिळणार आहे. दुसरे म्हणजे, कर्ज पुनर्गठित केलेल्या शेतकऱ्यांचे ३० जून २०१६ पर्यंतचे थकीत कर्ज ठरलेल्या मर्यादेत शासन भरणार आहे; मात्र त्याचवेळी पुनर्गठनानंतर २०१६-१७ या वर्षासाठी घेतलेले नवे कर्ज परतफेड केल्यासच कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे चालू वर्षाचे कर्ज भरल्याशिवाय बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी उभे करणारच नाहीत, हेही आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्षात सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हातात पडणारच नसल्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जातील किमान ४० टक्के रक्कम बँकांमध्ये भरावी लागणार आहे.शासन निर्णयातील काही मुद्यांवर स्पष्ट निर्देश मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचणी असल्यास बदल करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठित होणार आहे. ती समिती सहा महिन्यांपर्यंत त्यामध्ये दुरुस्ती सुचवणार आहे. - जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.