शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील भूमी अभिलेख विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:20 IST

अकोला: समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्प तसेच फेरफार व पुनर्विलोकन अर्ज व अपील अर्जांची शेकडो कामे असलेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील भूमी अभिलेख विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देनागपूरमधील भूमी अभिलेख कार्यालयात ३०, अकोल्यात ८, वाशिम ३, बुलडाणा ९, यवतमाळ ३, अमरावती ५ पदे रिक्त आहेत.वर्ध्यात ७, चंद्रपूर ४, भंडारा ६, गोंदिया ३, गडचिरोली येथेही पदे रिक्त असून, या रिक्त पदांचा भार कर्मचाºयांवर येत आहे. नागपूरमधील नगर भूमापान क्रमांक २ येथे महिन्याला तब्बल अडीच हजारांवर विविध स्वरूपाचे अर्ज दाखल होतात.

- सचिन राऊत

अकोला: समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्प तसेच फेरफार व पुनर्विलोकन अर्ज व अपील अर्जांची शेकडो कामे असलेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील भूमी अभिलेख विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. रिक्त पदांमुळे भूमी अभिलेख विभागातील कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असून, या कार्यालयांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होत असल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी ही पदे भरण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.विदर्भात नागपूरमधील भूमी अभिलेख कार्यालयात ३० च्या वर पदे रिक्त असून, अकोल्यात ८, वाशिम ३, बुलडाणा ९, यवतमाळ ३, अमरावती भूमी अभिलेख कार्यालयातही ५ पदे रिक्त आहेत. यासोबतच वर्ध्यात ७, चंद्रपूर ४, भंडारा ६, गोंदिया ३, गडचिरोली येथेही पदे रिक्त असून, या रिक्त पदांचा भार कर्मचाºयांवर येत आहे. विदर्भातील अनेक कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या असून, काहींना प्रतिनियुक्तीवर घेण्यात येत आहे; मात्र संबंधित कार्यालयातून त्यांना कार्यमुक्त करण्यात येत नसल्याचे वास्तव असून, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अडीच हजारांवर अर्जांची आवकनागपूरमधील नगर भूमापान क्रमांक २ येथे महिन्याला तब्बल अडीच हजारांवर विविध स्वरूपाचे अर्ज दाखल होतात. २४ मौजे असलेल्या या कार्यालयात हे अर्ज निकाली काढण्यासाठी दोन मुख्यालय सहायकांची पदे आहेत; मात्र ही दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यानंतर परीरक्षण भूमापकांची १२ पदांची आवश्यकता असताना येथे केवळ ३ कर्मचारी कार्यरत आहेत. कनिष्ठ लिपिकांची बदली झाल्याने एक ते दोनच लिपिक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे नागपूरसारख्या या मोठ्या शहरातील कार्यालयात एकही शिपाई नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कर्मचाºयांवर प्रचंड ताण येत असून, नागरिकांचीही कामे होत नसल्याचे दिसून येत आहे. भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दोन स्वतंत्र कार्यालयांचा प्रस्ताव धूळ खातअकोला तालुका भूमी अभिलेख व अकोला शहरासाठी नगर भूमापन कार्यालय अशी स्वतंत्र दोन कार्यालये असायला हवी; मात्र अकोला तालुका भूमी अभिलेख कार्यालयातच तालुका व शहराचा भार असल्याने नागरिकांची कामे तातडीने मार्गी लागत नाहीत. तालुका भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे नगर भूमापन कार्यालयाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आलेला आहे; मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार प्रचंड अडचणीत करावा लागत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भ