शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी केव्हीके सज्ज!

By admin | Updated: April 24, 2017 00:50 IST

कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्थेचे संचालक डॉ. चारीआप्पा यांच्याशी बातचीत

अकोला: कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच भेडसावणाऱ्या हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) सज्ज झाली आहेत. याबाबत शेतकरी मेळावे, प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना माहिती दिली जात असल्याची माहिती हैदराबाद येथील कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्थेचे संचालक डॉ. चारीआप्पा यांनी शनिवारी लोकमतशी बातचीत करताना दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्था, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथे कृषी विद्यापीठात कृषी विज्ञान केंद्राच्या दोन दिवसीय वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहण्यासाठी डॉ. चारीआप्पा येथे आले होते. याप्रसंगी त्यांनी केव्हीके राबवित असलेल्या विविध शेतीपयोगी उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.प्रश्न- महाराष्ट्रात किती केव्हीके आहेत?उत्तर- राज्यात ४४ केव्हीके असून, यातील विदर्भात १५ केव्हीकेंचा समावेश आहे. यामध्ये सात कृषी विद्यापीठांतर्गत, सात खासगी तर एक भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत नागपूरला आहे.प्रश्न- केव्हीकेचे कार्य काय आहे?उत्तर- कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान व शेतीपयोगी शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. संशोधित वाण, तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक घेऊन त्याचा शेतकऱ्यांमध्ये प्रचार, प्रसार केला जातो. शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाते. यावर्षी या सर्व उपक्रमासह हवामान बदलाला सामोरे जाताना, याला अनुकूल पिके, संशोधनाची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.जलसंवर्धन, संरक्षित ओेलीत,यासंदर्भात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जात असून, पेरणी कशी करावी आदीवर खास लक्ष दिले जात आहे.प्रश्न- येत्या खरीप हंगामासाठी केलेल्या उपाययोजन कोणत्या?उत्तर- केव्हीकेचे काम तसे कृषी विद्यापीठे आणि शेतकरी यामध्ये समन्वय राखण्याचे आहे. तद्वतच शेतकऱ्यांसाठी आयसीएआर व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली जाते. जसे पंतप्रधान विमा योजनेचा प्रचार, प्रसार, मृदा अर्थात माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करणे व ते करू न देणे आदी कामे व खरिपासाठीच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. प्रश्न- आदिवासी भागात केव्हीकेंनी कोणती कामे सुरू केली?उत्तर- सर्वसामान्य शेतकऱ्यांसह आदिवासी भागातील शेतकऱ्यांना नवे शेती तंत्रज्ञान समजावून सांगण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद यासंर्भात गंभीर आहे. आदिवासी भागातील शेतीमध्ये अलीकडे यामुळे चांगले बदल दिसून येत आहेत.प्रश्न- युवा शेतकऱ्यांसाठी कौशल्य विकासावर केव्हीके काम करीत आहे का?उत्तर - युवा शेतकऱ्यांना शेतीचे अद्ययावत नवे तंत्रज्ञान अवगत व्हावे, याकरिता कौशल्य विकास कार्यक्रमावर भर देण्यात आला आहे. प्रक्रिया उद्योगाचे कमी कालावधीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी केव्हीकेचे प्रयत्न असतात. तसेच युवकांना रोजगार उपलब्ध करू न देण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहे.प्रश्न- केव्हीकेच्या कामाचा आढावा कसा घेता?उत्तर- केव्हीकेना भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून अनुदान दिले जाते, त्यामुळे दरवर्षी केव्हीके करीत असलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाते. या मूल्यमापनाचा भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील दुर्गापूर केव्हीकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे.प्रश्न- केव्हीकेचे नियंत्रण कुठून होते?उत्तर- भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून केव्हीकेला शंभर टक्के निधी उपलब्ध करू न दिला जातो. केव्हीकेचे विभागीय कार्यालय यावर्षी पुण्याला देण्यात आले आहे. या कार्यालयांतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्याचे काम बघितले जाते.