शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

शेतीच्या वादातून एकास चाकूने भोसकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:59 IST

देवीकिसन घावट यांना मारहाण केली आणि धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला.

अकोला: शेतीच्या जुन्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांना मारहाण करून शेतकऱ्यास चाकूने भोसकल्याची घटना शुक्रवारी दुपारी घुसरवाडी येथे घडली. यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अकोट फैल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.घुसरवाडी येथे राहणारे देवीकिसन लक्ष्मण घावट (३४) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्याच नात्यातील अनिल शालीग्राम घावट, अशोक घावट, अंकुश अनिल घावट, संजय समाधान घावट यांच्यात गत काही वर्षांपासून वाद आहे. शुक्रवारी हा वाद उफाळून आला. या वादात अनिल घावट, अशोक घावट, अंकुश व संजय घावट आणि अनिल व अशोक यांच्या पत्नींनी देवीकिसन घावट यांना मारहाण केली आणि धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात देवीकिसन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी