शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मूर्तिजापूर तालुक्यात खरीप पेरणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 18:55 IST

Kharif sowing begins in Murtijapur taluka : पेरणी योग्य पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात आठवडाभरात अनेक ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. दरम्यान तालुक्यात मुबलक खत उपलब्ध असले तरी महाबीज बियाण्याचा प्रचंड तुटलडा मात्र तुटवडा जाणवत आहे.        तालुक्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणी योग्य पाऊस झाला आहे. या भागात शेतकरी खरीप पेरणीसाठी सरसावले आहेत. मूर्तिजापूर, कुरुम, शेलू बाजार मंडळात आतापर्यंत ७५ मिलीमीटर च्या वर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागत तातडीने आटोपून पेरणीला सुरुवात केली असली तरी संपूर्ण तालुक्यात आतापर्यंत केवळ ६८ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. आवश्यकते नुसार संपूर्ण तालुक्यासाठी ३ हजार ५०० क्विंटल महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आली होती परंतु ३ हजार १०० क्विंटल महाबीज बियाणे पुरविण्यात आले असल्याने प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तर खासगी कंपनीच्या ८ हजार ८०० क्विंटल मागणी नुसार पुर्तता झाली असली तरी बाजारात सद्यस्थितीत तोकड्या प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. भविष्यात महाबीज बियाणे बाजारात उपलब्ध होण्याची आशा मावळली असल्याने शेतकऱ्यांनी घरचे बियाणे उगवण शक्ती प्रक्रीया तपासून घेऊन व बिज प्रक्रीया करुन बियाणे वापण्याचा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. सद्यस्थितीत बाजारात महाबीज वगळता इतर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे केवळ ६०० क्विंटल बतियाने बाजारात उपलब्ध आहे. पिकांसाठी आवश्यक असलेले सर्व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची खताची चिंता मिटली आहे. हल्ली  कुठलेही खत उपलब्ध आहे. एकूण ३ हजार टन खतसाठा आजमितीस आहे. तर त्या डीएपी ३७५ मेट्रिक टन असल्याने शेतकऱ्यांची खतांची चिंता मिटली असली तरी महाबीजचे बियाणे १२ टक्केच उपलब्ध झाल्याने व इतर बियाण्यांच्या किंमती पेक्षा स्वस्त असल्याने महाबीज बियाण्याची वाणवा होत आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस