शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

काटेपूर्णा धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 16:46 IST

२५ जुलै रोजी महान धरणाची पाणी पातळी ११०९.३० फूट, ३३८.१२ मीटर, २.७२२ द.ल.घ.मी. व ३.१५ टक्के अशी होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : पावसाळ्याचा पूर्ण दीड महिना उलटल्यावरही काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात तीळमात्र वाढ झाली नाही. २५ जुलै रोजी महान धरणाची पाणी पातळी ११०९.३० फूट, ३३८.१२ मीटर, २.७२२ द.ल.घ.मी. व ३.१५ टक्के अशी होती. २५ जुलै २०१८ रोजी धरणात ११२४.४० फूट, ३४२.७२ मीटर, २९.७८९ द.ल.घ.मी. व ३४.४८ टक्के असा जलसाठा उपलब्ध होता. या तुलनेत यावर्षी महान धरणात ३१ टक्के जलसाठा कमी असून, २७ द.ल.घ.मी. पाणी कमी आहे.गेल्यावर्षी ५ जूनपासूनच धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली होती; परंतु यावर्षी पाऊस नसल्याने धरणाच्या पाणी पातळीत किंचितही वाढ होऊ शकली नाही.अकोला शहराला पाणी पुरवठ्याकरिता महान धरणात दरवर्षी २४ द.ल.घ.मी. जलसाठा आरक्षित ठेवण्यात येतो; परंतु धरणात एकूण २.७२२ द.ल.घ.मी. पाणी साठा उरल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. महान धरणाचा जिवंत जलसाठा ११०७.०० वर येऊन संपतो. त्यानंतर मृत जलसाठ्यास सुरुवात होते. या पाणी पातळीप्रमाणे महान धरणात केवळ २ फूटच जिवंत जलसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाच्या क्षेत्रात येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास पाणी पुरवठा योजना संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काटा कोंडाळा नदी अद्यापही कोरडीठण्ण!महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मालेगाव परिसरात दमदार पावसाची आवश्यकता आहे. कारण मालेगाव परिसरातून काटा कोंडाळा, जऊळका, अमनवाडी, मुसळवाडी, धानोरा इत्यादी ठिकाणी पाऊस झाल्यास ते पाणी काटा कोंडाळा नदीने महान धरणात येऊन मिळते. मालेगाव पाणलोट क्षेत्रातील कुरड, सुकांडा, सुधी, कोली, खडकी, मसला, सोनखास, ब्राम्हणवाडा, डव्हा आणि चाका तीर्थ असे दहा लघू तलाव आहेत. ते १०० टक्क्यांपर्यंत भरलेले नाहीत. वरील दहाही लघू तलाव १०० टक्के भरल्याशिवाय त्या भागातील पाणी काटा कोंडळा नदीच्या पात्रात वाहू शकत नाही.

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोलाdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई