शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

वनशास्त्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नोकरीपासून वंचित!

By admin | Updated: July 14, 2014 01:23 IST

केंद्र शासन व राष्ट्रीय वन आयोगाने वनविभागातील नोकरीत आरक्षण देण्याची शिफारस केली आहे

अकोला : राज्यातील वनशास्त्र पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना केंद्र शासन व राष्ट्रीय वन आयोगाने वनविभागातील नोकरीत आरक्षण देण्याची शिफारस केली आहे; परंतु राज्य शासन नोकरी देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठामध्ये वनशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. राज्यातील डॉ. पंजाबराव देशमुख अकोला व डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली या दोन ठिकाणी सन १९८५-८६ पासून वनशास्त्र पदवी अभ्यासक्रम शिकविला जात आहे. आतापर्यत शेकडो विद्यार्थ्यांनी वनशास्त्र अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त केली आहे. या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना राज्य सरकारांनी वन विभागाच्या नोकरीत सामावून घ्यावे, अशा सुचना सन १९८८ च्या वननीतीनुसार केंद्र शासनाने राज्यांना केलेल्या आहेत. २00६ साली राष्ट्रीय वन आयोगानेही या पद्धतीची शिफारस केलेली असून, वनक्षेत्रपाल व सहाय्यक वनसंरक्षक नोकर भरती करताना वनशास्त्र पदवीधारकामधूनच करावी, असे स्पष्टपणे या आयोगाने निर्देश दिलेले आहेत. तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर, कर्नाटक, ओडिशा या राज्यांनी या विद्यार्थ्यांंना वनसेवेत आरक्षण दिलेले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना वन महाविद्यालयात पर्यावरण, वन्य जीव, वनसंवर्धन शास्त्र, वनव्यवस्थापन, वनआराखडा पद्धती, वनव्यवस्थापन अर्थशास्त्र, वनसंरक्षण व कायदे शिकविले जातात. एकूण ४९ वनासंबंधी विषयाचा अभ्यास या चार वर्षाच्या पदवी कालावधीत शिकवला जातो. तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहा महिने वन कार्यानुभव, व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. असे असताना पदवीची पायमल्ली होत असल्यांची भावना या विद्यार्थ्यांंची झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांंना बँकिंग, अग्रोबेस्ड इंडस्ट्रिज इत्यादी क्षेत्रात रोजगाराची संधी नाकारली जात आहे. दुसरीकडे वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या मोजक्या जागा आहेत. या स्पर्धेला तोड देऊन प्रवेश मिळवायचा दुसरीकडे नोकरीसाठी संघर्ष, यातच हे विद्यार्थी गार झाले आहेत.