शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जरांगे पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घ्यावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

By संतोष येलकर | Updated: January 19, 2024 20:00 IST

लोकसभा निवडणुकीत उतरले पाहिजे

अकोला : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घेऊन, आगामी लोकसभा निवडणुकीत उतरले पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींच्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि गरीब मराठा प्रवर्गाला वेगळे आरक्षण असावे, अशी आम्ही भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे-पाटील यांना झुलवण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे जरांगे यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगत लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली असून, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये, असे सत्तेतील श्रीमंत मराठ्यांना वाटते, असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला. गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा लढा गत ३५ वर्षांपासून सुरू आहे; परंतु जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलनाच्या निमित्ताने या लढ्याला स्वरूप आले, आकार आला, मागणी पुढे आली असून समाजात सहानुभूती असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनासोबतच जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, बालमुकुंद भिरड, गजानन गवइ, विकास सदांशिव, विकास सदांशिव, मजर अली आदी उपस्थित होते.

गरीब मराठ्यांचा आवाज, लोकसभेत गेला पाहिजेगरीब मराठ्यांचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे, यासाठी जरांगे-पाटील योग्य भूमिका घेतील, गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षाही ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली. जरांगे-पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठ्यातील नेतृत्व उभे राहिले असून, गरीब मराठ्यांनी त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे आवाहन करीत, जरांगे-पाटील यांनी जी ताकद निर्माण केली आहे, त्याआधारे ते संसदेत पाेहोचू शकतात आणि तेथे गेल्यानंतर प्रश्नाचा निकाल लावता येतो, असेही आंबेडकर यांनी सांगितले.आघाडीसंदर्भात आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू !आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीतील वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाच्या संदर्भात काँग्रेसने योग्य भूमिका घेतली पाहिजे, या संदर्भातील निर्णयाबाबत आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू, असेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील