शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जरांगे पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घ्यावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

By संतोष येलकर | Updated: January 19, 2024 20:00 IST

लोकसभा निवडणुकीत उतरले पाहिजे

अकोला : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घेऊन, आगामी लोकसभा निवडणुकीत उतरले पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींच्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि गरीब मराठा प्रवर्गाला वेगळे आरक्षण असावे, अशी आम्ही भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे-पाटील यांना झुलवण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे जरांगे यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगत लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली असून, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये, असे सत्तेतील श्रीमंत मराठ्यांना वाटते, असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला. गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा लढा गत ३५ वर्षांपासून सुरू आहे; परंतु जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलनाच्या निमित्ताने या लढ्याला स्वरूप आले, आकार आला, मागणी पुढे आली असून समाजात सहानुभूती असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनासोबतच जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, बालमुकुंद भिरड, गजानन गवइ, विकास सदांशिव, विकास सदांशिव, मजर अली आदी उपस्थित होते.

गरीब मराठ्यांचा आवाज, लोकसभेत गेला पाहिजेगरीब मराठ्यांचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे, यासाठी जरांगे-पाटील योग्य भूमिका घेतील, गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षाही ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली. जरांगे-पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठ्यातील नेतृत्व उभे राहिले असून, गरीब मराठ्यांनी त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे आवाहन करीत, जरांगे-पाटील यांनी जी ताकद निर्माण केली आहे, त्याआधारे ते संसदेत पाेहोचू शकतात आणि तेथे गेल्यानंतर प्रश्नाचा निकाल लावता येतो, असेही आंबेडकर यांनी सांगितले.आघाडीसंदर्भात आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू !आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीतील वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाच्या संदर्भात काँग्रेसने योग्य भूमिका घेतली पाहिजे, या संदर्भातील निर्णयाबाबत आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू, असेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील