शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जनता कर्फ्यू : वाशिम येथील बाजारपेठ कडकडीत बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:08 IST

पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाश्मि : वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी मंडळाने शहरात १६ सप्टेंबरपासून सात दिवशीय ‘जनता कफ्यू’ची हाक दिली. पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. ‘जनता कर्फ्यूू’ला व्यापाऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, रस्त्यावर वाहनधारक, पादचाऱ्यांची वर्दळही दिसून आली. पुढील सहा दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला असून, मृत्यूच्या संख्येने अर्धशतक ओलांडले. जिल्ह्यात सध्या ३०४१ रुग्णसंख्या असून, यापैकी ८५८ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. वाशिम शहरात ९०० पेक्षा अधिक एकूण रुग्णसंख्या असतानाही, बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या पृष्ठभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान वाशिम शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय व्यापाºयांनी १३ सप्टेंबरच्या बैठकीत जाहिर केला होता. त्यानुसार १६ सप्टेंबरपासून जनता कर्फ्यू पाळला जात असून, पहिल्याच दिवशी दवाखाने, मेडीकल, दूध संकलन व विक्री वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.

सहकार्य करण्याचे आवाहनवाशिम शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. शहरातील बाजारपेठेत गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सात दिवस बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. जनता कर्फ्यूदरम्यान नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नेहमी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन व्यापारी मंडळाने केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक