शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ कामांचा बोजवारा;  जिल्ह्यात केवळ ६०६ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:57 IST

अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये १ हजार ९२० कामे प्रस्तावित करण्यात आली असली तरी, त्यापैकी २६ फेबु्रवारीपर्यंत केवळ ६०६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

- संतोष येलकर

अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये १ हजार ९२० कामे प्रस्तावित करण्यात आली असली तरी, त्यापैकी २६ फेबु्रवारीपर्यंत केवळ ६०६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ च्या कामांचा बोजवारा उडाला असून, उर्वरित कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यात वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील १४४ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ची १ हजार ९२० कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यापैकी २६ फेबु्रवारीपर्यंत केवळ ६०६ कामे पूर्ण करण्यात आली असून, ४५८ कामे सुरू आहेत. उर्वरित कामे करण्यास तीन महिन्यांचा कालावधी उरला असून, लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’च्या कामांचा बोजवारा उडाल्याची बाब समोर येत आहे.‘जलयुक्त’ची पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत कामे !तालुका                          कामेअकोला                        ५४अकोट                          ९३बाळापूर                       ५६बार्शीटाकळी               २६२तेल्हारा                         ०९पातूर                            ८७मूर्तिजापूर                    ४५.........................................एकूण                         ६०६१३१४ कामे प्रलंबित !जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये प्रस्तावित कामांपैकी ६०६ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित १ हजार ३१४ कामे प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेली जलयुक्त शिवारची कामे संबंधित यंत्रणांकडून केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.मंजूर निधी ३५ कोटी; खर्च केवळ ५ कोटी !जिल्ह्यातील ‘जलयुक्त शिवार’ च्या कामांसाठी ३५ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या ६०६ कामांवर केवळ ५ कोटी १७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, उर्वरित ३० कोटी रुपयांचा निधी खर्च केव्हा होणार आणि कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाJalyukt Shivarजलयुक्त शिवार