शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

काटेपूर्णा धरणातून केवळ ४ हजार हेक्टरवर सिंचन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 15:05 IST

सिंचनासाठी अपेक्षित मागणी नसल्याने ८ हजार ३२५ पैकी आजमितीस केवळ ४ हजार हेक्टरवर सिंचन झाले आहे.

अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा आजमितीस ७७.१५ टक्के आहे. १०० टक्के जलसाठा या धरणात संचयित झाला होता. दोन महिन्यांत २३ टक्के पाणी वापर झाले आहे. पिण्याच्या पाण्यासह यावर्षी सिंचनाला या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे; परंतु सिंचनासाठी अपेक्षित मागणी नसल्याने ८ हजार ३२५ पैकी आजमितीस केवळ ४ हजार हेक्टरवर सिंचन झाले आहे. असे असले तरी यावर्षी उन्हाळी पिकांना पाणी सोडले जाणार नाही.यावर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले. अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातूनही यावर्षी पाण्याचा विसर्ग करावा लागला. आजमितीस काटेपूर्णा धरणात ७७.१५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा या मध्यम स्वरू पाच्या धरणात ७३.०३ टक्के, निर्गुणात ७३.९३ टक्के, उमा धरणात ५२.४८ टक्के तसेच घुंगशी बॅरेजमध्ये ७१.०५ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी उशिरा पाणी सोडण्यात आले; परंतु शेतकऱ्यांची मागणीच अपुरी असल्याने काटेपूर्णा धरणातून दररोज १६० क्यूसेस पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.काटेपूर्णा धरणातून अकोला शहर, मूर्तिजापूर, अकोला औद्योगिक वसाहत व खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून ६४ खेड्यांना पाणी सोडण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणातून ८ हजार ३२५ हेक्टरला सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. तथापि, यावर्षी आतापर्यंत ४ हजार हेक्टरलाच पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी काटेपूर्णा धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने खारपाणपट्ट्यातील ६४ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

अकोल्याचे २४ दलघमी आरक्षणअकोला शहरासाठी २४ दलघमीचे आरक्षण आहे. महिन्याला दोन दलघमी पाण्याचा वापर होत आहे.

रब्बी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत ४ हजार हेक्टरवर सिंंचन सुरू आहे. पावसाळा लांबल्याने पाण्याची मागणी घटल्याचे यावर्षीचे चित्र आहे. उन्हाळी पिकांना पाणी सोडण्याचे कोणतेही नियोजन नाही.- अभिजित नितनवरे,उप-विभागीय अभियंता,पाटबंधारे विभाग,बोरगाव मंजू.

 

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती