शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्याचे पीक तुषार सिंचनावर; हिवाळी, उन्हाळी पिकांना धरणातून पाणी पुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 13:38 IST

पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे.

अकोला- पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. बहुतांश भागात भूगर्भ पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांना संरक्षित ओलितासाठी पाणी नाही. जेथे थोडेफार पाणी तसेच वीज उपलब्ध आहे, तेथील शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. 

खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर होती. पण परतीचा दमदार पाऊस न झाल्याने जमिनीत पूरक ओलावाच नव्हता. परिणामी, पश्चिम विदर्भातील एकूण रब्बीच्या क्षेत्रापैकी ३६ टक्के क्षेत्र नापेर आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना आता पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील धरणात यावर्षी पूरक जलसाठा संचयित झाला नसल्याने हिवाळी, उन्हाळी पिकांना पाणी न सोडण्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केल्याने शेतकरी हतबल झाला.  

यावर्षी पश्चिम विदर्भात ९१ टक्के क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली. अकोला जिल्ह्यातील शेतकºयांनी ४८,१४७ पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी ४६,३५९ हेक्टरवर हरभरा पेरणी केली. बुलडाणा जिल्ह्यात ९१ हजार १३६ हेक्टरवर हरभरा पेरणी करण्यात आली असून, वाशिम जिल्ह्यात ३४,४४४ हेक्टरवर, यवतमाळ जिल्ह्यात ७६,३४३ तर अमरावती जिल्ह्यात ६२ हजार २६४ हेक्टरवर हरभरा पेरणी केली. हरभरा पिकाला जमिनीत ओलावा बऱ्यापैकी लागतो, त्यानंतर हिवाळ्यातील थंडीमुळे हे पीक येते. तथापि, हरभरा पेरणीनंतर पंधरा दिवस ढगाळ वातावरण होते. त्याचा प्रतिकूल परिणाम या पिकावर झाल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित ओलिताची सोय आहे, तेथे पाणी देऊन हरभरा जगविण्याचे शेतकºयांचे प्रयत्न सुरू  आहेत. पण बहुतांश शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नाही.

- कृषी विद्यापीठातील हरभरा तुषार सिंचनावर!डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हरभरा पेरणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हरभºयाचे बीजोत्पादन घेण्यासाठी कृषी विद्यापीठाने हरभरा पेरणी केली; पण जमिनीत ओलावा नसल्याने कृषी विद्यापीठाला तुषार सिंचनावर हे पीक जगवावे लागत आहे. शेतकऱ्यांकडे संरक्षित ओलितासाठी पाणी उपलब्ध असेल, तर त्या पाण्याचे नियोजन करावे, पाण्याच्या उपलब्धतेनुसार क्षेत्र ठरवावे, तेवढ्याच क्षेत्राला पाणी द्यावे.- डॉ. सुभाष टाले, विभाग प्रमुख, मृद व जलसंधारण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.