शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आज सुटणार पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सिंचनाचा तिढा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:09 IST

तेल्हारा : तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले वारी हनुमान येथील धरण  यावर्षी शंभर टक्के भरले आहे. प्रशासनाने धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा घाट  घातला आहे. त्याला तालुक्यातील शेतकर्‍यांनी विरोध सुरू केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २0 नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता अकोला येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात अधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

ठळक मुद्देशेतकरी, वान प्रकल्प अधिकार्‍यांची अकोल्यात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले वारी हनुमान येथील धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी  आशा होती; मात्र प्रशासनाने धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा घाट  घातला आहे. त्याला तालुक्यातील शेतकर्‍यांनी विरोध सुरू केला आहे. यावर  तोडगा काढण्यासाठी २0 नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता शेतकरी व पाटबंधारे  विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक अकोला येथील पाटबंधारे विभागाच्या  कार्यालयात होणार आहे. या बैठकीत सिंचनाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. यावर्षी वान धरण १00 टक्के भरले आहे. सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने मूग,  उडीद, सोयाबीनचे उत्पादन घटले. कपाशीवर बोंडअळी आल्याने ते पीकही शे तकर्‍यांना घेता आले नाही. शेतकर्‍यांनी हरभरा पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली  आहे; मात्र त्यासाठी वानच्या अधिकार्‍यांनी पाणी सोडले नाही. पाणी सोडण्यासाठी  तीन वेळा शेतकर्‍यांच्या बैठका घेण्यात आल्या; परंतु काही लोकप्रतिनिधींनी वानचे  पाणी अकोल्यात पळविण्याचा घाट घताल्याने शेतकर्‍यांना अजूनही पाणी मिळाले  नाही. याबाबत शेतकर्‍यांची बैठक अकोला येथे ठेवण्यात आली आहे. या बैठकीत  शेतकर्‍यांना न्याय मिळणार की शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार, याकडे तेल्हारा तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्प