शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

पीक कर्जावरील व्याजमाफी एकरी १६0 रुपये!

By admin | Updated: January 5, 2017 02:42 IST

शेतकर्‍यांची बोळवण; पंतप्रधानांच्या घोषणेत तोकडी व्याजमाफी.

अकोला, दि. ४- नोटाबंदीच्या कालावधीत शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील गत दोन महिन्यांच्या व्याजमाफीची घोषणा पंतप्रधानांनी केली. कापूस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील मुख्य पिके असून, या पिकांसाठी मिळालेले कर्ज आणि त्यावर दोन महिन्यांची मिळणारी व्याजमाफी बघता, शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील एकरी केवळ १६0 रुपये व्याजमाफीचा लाभ होणार आहे. व्याजमाफीची ही रक्कम अत्यंत तोकडी असल्याने, व्याजमाफीची ही घोषणा शेतकर्‍यांची बोळवण करणारी ठरणार आहे.गत ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारमार्फत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. नोटाबंदीच्या आदेशामुळे बँकांच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले होते. गत ३१ डिसेंबरपर्यंत आर्थिक निर्बंध लागू होते. या ५0 दिवसांच्या नोटाबंदीच्या कालावधीत शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील नोटाबंदीच्या कालावधीतील नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे व्याज माफ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ३१ डिसेंबर रोजी केली. यावर्षीच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १ लाख २१ हजार ३५६ शेतकर्‍यांना ८१८ कोटी ४९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. कापूस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील मुख्य पिके असून, कापूस पिकासाठी हेक्टरी ३४ हजार आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी २६ हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज बँकांमार्फत मंजूर करण्या त आले. खरीप पीक कर्जावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत सहा टक्के, तर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत सात टक्के व्याजदर आकारला जातो. त्यानुसार प्रचलित व्याजदरानुसार एकरी १६ हजार रुपयांच्या कपाशीच्या पीक कर्जावर सहा टक्के व्याजदराप्रमाणे दोन महिन्यांचे व्याज १६0 रुपये होते, तर सोयाबीन पिकाच्या पीक कर्जावरील एकरी व्याज १३0 रु पये होते. त्यानुसार जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील दोन महिन्यांचे व्याज केवळ १३0 ते १६0 रुपये माफ होणार आहे. या पृष्ठभूमीवर पीक कर्जावरील नोटाबंदीच्या कालावधीतील दोन महिन्यांच्या व्याजमाफीच्या या घोषणेत शासनामार्फत अत्यंत तोकडी रक्कम माफ करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पीक कर्जावरील व्याजमाफीची ही घोषणा संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांची बोळवण करणारी ठरणार आहे.रब्बी पीक कर्ज वाटप केवळ १५ कोटी!यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात ५१ कोटी ५२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे; मात्र त्या तुलनेत डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ १ हजार ६१५ शेतकर्‍यांना १५ कोटी ६४ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.