शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जावरील व्याजमाफी एकरी १६0 रुपये!

By admin | Updated: January 5, 2017 02:42 IST

शेतकर्‍यांची बोळवण; पंतप्रधानांच्या घोषणेत तोकडी व्याजमाफी.

अकोला, दि. ४- नोटाबंदीच्या कालावधीत शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील गत दोन महिन्यांच्या व्याजमाफीची घोषणा पंतप्रधानांनी केली. कापूस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील मुख्य पिके असून, या पिकांसाठी मिळालेले कर्ज आणि त्यावर दोन महिन्यांची मिळणारी व्याजमाफी बघता, शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील एकरी केवळ १६0 रुपये व्याजमाफीचा लाभ होणार आहे. व्याजमाफीची ही रक्कम अत्यंत तोकडी असल्याने, व्याजमाफीची ही घोषणा शेतकर्‍यांची बोळवण करणारी ठरणार आहे.गत ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारमार्फत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. नोटाबंदीच्या आदेशामुळे बँकांच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले होते. गत ३१ डिसेंबरपर्यंत आर्थिक निर्बंध लागू होते. या ५0 दिवसांच्या नोटाबंदीच्या कालावधीत शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील नोटाबंदीच्या कालावधीतील नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे व्याज माफ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ३१ डिसेंबर रोजी केली. यावर्षीच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १ लाख २१ हजार ३५६ शेतकर्‍यांना ८१८ कोटी ४९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. कापूस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील मुख्य पिके असून, कापूस पिकासाठी हेक्टरी ३४ हजार आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी २६ हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज बँकांमार्फत मंजूर करण्या त आले. खरीप पीक कर्जावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत सहा टक्के, तर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत सात टक्के व्याजदर आकारला जातो. त्यानुसार प्रचलित व्याजदरानुसार एकरी १६ हजार रुपयांच्या कपाशीच्या पीक कर्जावर सहा टक्के व्याजदराप्रमाणे दोन महिन्यांचे व्याज १६0 रुपये होते, तर सोयाबीन पिकाच्या पीक कर्जावरील एकरी व्याज १३0 रु पये होते. त्यानुसार जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील दोन महिन्यांचे व्याज केवळ १३0 ते १६0 रुपये माफ होणार आहे. या पृष्ठभूमीवर पीक कर्जावरील नोटाबंदीच्या कालावधीतील दोन महिन्यांच्या व्याजमाफीच्या या घोषणेत शासनामार्फत अत्यंत तोकडी रक्कम माफ करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पीक कर्जावरील व्याजमाफीची ही घोषणा संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांची बोळवण करणारी ठरणार आहे.रब्बी पीक कर्ज वाटप केवळ १५ कोटी!यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात ५१ कोटी ५२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे; मात्र त्या तुलनेत डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ १ हजार ६१५ शेतकर्‍यांना १५ कोटी ६४ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.