शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात;  टोपले, सुप, फळे विकण्याची आली पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:37 IST

Murtijapur News : अनेक दिवस व्यवसाय नसल्याने या व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी टोपले, सुप, फळे विकण्यासह हात मजूरीची कामे करावी लागत आहे.

- संजय उमक मूर्तिजापूर : लॉकडाऊने भल्याभल्यांना वाट दाखवली त्यात मोठ्या व्यवसायापासून ते किरकोळ मंजूरही भरडल्या गेले, अनेकांचा यामुळे रोजगार गेला आहे तर कित्येक जणांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकाळात लग्न समारंभात मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली वाजंत्री व्यवसायाला परवानगी नसल्याने त्यांना सहजच या समारंभातून वगळण्यात आले. अनेक दिवस व्यवसाय नसल्याने या व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी टोपले, सुप, फळे विकण्यासह हात मजूरीची कामे करावी लागत आहे.              कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षापासून अनेक लहान मोठे व्यवसाय संकटात आले आहेत. याचा परिणाम हात मजूरांनाही भोगावा लागला. कोरोना काळात लग्न मंडपी वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यात एकत्र येण्यास बंधने असल्याने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह पार पडण्याची परवानगी असल्याने धुमधडाक्यात लग्न करणारांचे मनसूबे पार धुळीस मिळाले आहे. या कालावधीत विवाह समारंभ मोजकेच पार पडत असल्याने, या समारंभात मुख्य भूमिका असलेल्या वाजंत्री वाजविणाऱ्यांचा व्यवसाय सुध्दा ठप्प झाल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. हा व्यवसाय महाराष्ट्रात बहूदा विशिष्ट समाजाच्या माध्यमातून चालविला जातो, मातंग जमाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे वाजंत्री वाजविनणे व बांबू आणि शिंदोळी झाडापासू फळे बणविणे यासाठी कुशल हस्त कारागीरीने ते टोपले, सुप, फळे आदी घरगुती कामासाठी लागणाऱ्या विशिष्ट वस्तू बणवतात, परंतू वाजंत्री वाजविणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. हाच व्यवसाय गत दीड वर्षभरापासून बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे, बॅंड व्यवसायाचे संचालकही हतबल झाले असून त्यांनाही इतर कामे करावी लागत आहे. काहींनी तर बॅंडसाठी वापरण्यात येत असलेल्या गाडीवरच आपला टोपले, सुप विक्रीचा व्यवसाय थाटला आहे.  बॅंड पार्टीत मजूरी दाखल वाजंत्री वाजविण्याचे काम करीत असणाऱ्या कलाकाराचा हा व्यवसाय बंद पडल्याने अक्षरशः उपासमारीची पाळी आली आहे तर काही इतर किरकोळ मजूरी करुन आपल्या संसाराचा गाडा ओढून आपली उपजीविका भागवीत आहे. 

 आमचा वाजंत्री वाजविण्याचा मुख्य व्यवसायच दीड वर्षांपासून बंद आहे, प्रामुख्याने चार महीने चालणाऱ्या व्यवसायावरच आम्हा एक वर्ष कुटुंब चालवावे लागते, एका बॅंड पथकात किमान ३० लोक असतात यावरच यांच्या घरची चुल पेटते, उपासमारीची वेळ आल्याने शासनाने कलांवत म्हणून मदतीचा हात पुढे करावा.-नरेंद्र आमटेगाडगेबाबा बॅंड पथक संचालक, मूर्तिजापूर गत दीड वर्षापासून वाजंत्री व्यवसाय बंद असल्याने वाजंत्री कलावंत हा आर्थिक संकटात सापडला आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा जोड धंदा अथवा व्यवसाय नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी.- प्रकाश आमटेसंचालक, श्याम बॅंड पार्टी, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरSocialसामाजिक