शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात;  टोपले, सुप, फळे विकण्याची आली पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:37 IST

Murtijapur News : अनेक दिवस व्यवसाय नसल्याने या व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी टोपले, सुप, फळे विकण्यासह हात मजूरीची कामे करावी लागत आहे.

- संजय उमक मूर्तिजापूर : लॉकडाऊने भल्याभल्यांना वाट दाखवली त्यात मोठ्या व्यवसायापासून ते किरकोळ मंजूरही भरडल्या गेले, अनेकांचा यामुळे रोजगार गेला आहे तर कित्येक जणांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकाळात लग्न समारंभात मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली वाजंत्री व्यवसायाला परवानगी नसल्याने त्यांना सहजच या समारंभातून वगळण्यात आले. अनेक दिवस व्यवसाय नसल्याने या व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी टोपले, सुप, फळे विकण्यासह हात मजूरीची कामे करावी लागत आहे.              कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षापासून अनेक लहान मोठे व्यवसाय संकटात आले आहेत. याचा परिणाम हात मजूरांनाही भोगावा लागला. कोरोना काळात लग्न मंडपी वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यात एकत्र येण्यास बंधने असल्याने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह पार पडण्याची परवानगी असल्याने धुमधडाक्यात लग्न करणारांचे मनसूबे पार धुळीस मिळाले आहे. या कालावधीत विवाह समारंभ मोजकेच पार पडत असल्याने, या समारंभात मुख्य भूमिका असलेल्या वाजंत्री वाजविणाऱ्यांचा व्यवसाय सुध्दा ठप्प झाल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. हा व्यवसाय महाराष्ट्रात बहूदा विशिष्ट समाजाच्या माध्यमातून चालविला जातो, मातंग जमाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे वाजंत्री वाजविनणे व बांबू आणि शिंदोळी झाडापासू फळे बणविणे यासाठी कुशल हस्त कारागीरीने ते टोपले, सुप, फळे आदी घरगुती कामासाठी लागणाऱ्या विशिष्ट वस्तू बणवतात, परंतू वाजंत्री वाजविणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. हाच व्यवसाय गत दीड वर्षभरापासून बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे, बॅंड व्यवसायाचे संचालकही हतबल झाले असून त्यांनाही इतर कामे करावी लागत आहे. काहींनी तर बॅंडसाठी वापरण्यात येत असलेल्या गाडीवरच आपला टोपले, सुप विक्रीचा व्यवसाय थाटला आहे.  बॅंड पार्टीत मजूरी दाखल वाजंत्री वाजविण्याचे काम करीत असणाऱ्या कलाकाराचा हा व्यवसाय बंद पडल्याने अक्षरशः उपासमारीची पाळी आली आहे तर काही इतर किरकोळ मजूरी करुन आपल्या संसाराचा गाडा ओढून आपली उपजीविका भागवीत आहे. 

 आमचा वाजंत्री वाजविण्याचा मुख्य व्यवसायच दीड वर्षांपासून बंद आहे, प्रामुख्याने चार महीने चालणाऱ्या व्यवसायावरच आम्हा एक वर्ष कुटुंब चालवावे लागते, एका बॅंड पथकात किमान ३० लोक असतात यावरच यांच्या घरची चुल पेटते, उपासमारीची वेळ आल्याने शासनाने कलांवत म्हणून मदतीचा हात पुढे करावा.-नरेंद्र आमटेगाडगेबाबा बॅंड पथक संचालक, मूर्तिजापूर गत दीड वर्षापासून वाजंत्री व्यवसाय बंद असल्याने वाजंत्री कलावंत हा आर्थिक संकटात सापडला आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा जोड धंदा अथवा व्यवसाय नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी.- प्रकाश आमटेसंचालक, श्याम बॅंड पार्टी, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरSocialसामाजिक