शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विद्यार्थ्यांना मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:05 IST

विहित मुदतीत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांना देण्यात आले आहेत.

अकोला : महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांना विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक कैलास कणसे यांनी शुक्रवारी येथे दिली.विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत मिळतात की नाही, विद्यार्थ्यांना विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात अडचणी आहेत काय, यासंदर्भात अकोला व वाशिम जिल्ह्यातील कामाचा आढावा अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विहित मुदतीत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांना देण्यात आले आहेत, असे कैलास कणसे यांनी सांगितले. यावेळी अकोला व वाशिम जिल्ह्यातील जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांचे अधिकारी उपस्थित होते.‘यूपीएससी कोचिंग’साठी२०० विद्यार्थ्यांना पाठविले दिल्लीला!डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) ‘आयबीपीएस’ योजनेंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससी परीक्षेच्या कोचिंगसाठी पाठविले जाते. त्यामध्ये यावर्षी राज्यातील २०० विद्यार्थ्यांना ‘यूपीएससी’च्या ‘कोचिंग’साठी दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती ‘बार्टी’चे महासंचालक कैलास कणसे यांनी दिली.योजनांच्या जनजागृतीचा कार्यक्रम राबविणार!शासनामार्फत मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजनांसंदर्भात जनजागृतीचा कार्यक्रम ‘बार्टी’मार्फत राज्यात राबविण्यात येणार आहे, असेही कैलास कणसे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाScholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी