शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एकवीसऐवजी वीस एक बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:38 IST

या बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

अकोला: बालभारतीने इयत्ता दुसरीच्या गणित विषयात आणि संख्या वाचनाच्या केलेल्या बदलामुळे सोशल मीडियावर प्रचंड वादळ उठले आहे. या बदलाची शिक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बालभारतीने गणित विषयात केलेला बदल अनाकलनीय आहे. यापूर्वी एकवीस, बावीस, तेवीस शिकविले जायचे. पाढे म्हटले जायचे आहे. आता विद्यार्थ्यांना एकवीसऐवजी वीस एक असे शिकविले जाणार आहे. त्यातही मुलांना पाढे कसे शिकवायचे, असा प्रश्न पूर्व प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित करीत या बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.गणिताच्या विषयामध्ये जोडाक्षरांचे उच्चारण करणे विद्यार्थ्यांना कठीण जाते. म्हणून बालभारतीने इयत्ता दुसरीच्या गणित विषयात काही बदल केले आहेत. एकवीस नव्हे, तर आता वीस एक, बावीसऐवजी वीस दोन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. ७१ चा उच्चार सत्तर एक असा करावा लागणार आहे. त्र्याण्णवचा उच्चार करणे विद्यार्थ्यांना कठीण होतो म्हणून त्यामुळे नव्वद तीन असा उच्चार करावा लागेल. १ ते १00 या ठिकाणी जिथे जोडाक्षरे येतात. तिथे संख्या वाचनाची सूचना बालभारतीच्या अभ्यास मंडळाने केली आहे. या बदलाचा विद्यार्थी, शिक्षकांवर काय परिणाम होणार आहे, विद्यार्थी हा बदल स्वीकारतील का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात पूर्व प्राथमिक शिक्षकांनी विषयातील बदलाबद्दल नाराजी व्यक्त करीत, बदल करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. सध्याची पिढी अत्यंत हुशार आहे. जुन्या गणित विषय, पाढ्यांचे उच्चारण कठीण असले तरी, त्यातून विद्यार्थ्यांची भाषाशुद्धी होते, अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी नोंदविल्या आहेत. (प्रतिनिधी)जुना अभ्यासक्रम चांगला आहे. पाढ्यांचे उच्चारण कठीण असले तरी, या उच्चारणामुळे विद्यार्थ्यांची भाषाशुद्धी होते. बालभारतीने गणित विषयात केलेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे. मराठीतील पाढे आयुष्यभर लक्षात राहतात. एकवीसऐवजी वीस एक असा बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे का?-भारती कुळकर्णी, उपमुख्याध्यापिका,बालशिवाजी प्राथमिक शाळा.गणित विषयात बदल करण्याची काहीच गरज नव्हती. विद्यार्थ्यांना जुन्याच विषयाचे वळण लागले आहे. त्यांना नवीन बदलानुसार शिकविताना अडचणी जातील. विद्यार्थ्यांचा गोंधळ उडेल. विद्यार्थ्यांनी एकवीसही लिहिले आणि वीस एकही लिहिले तर दोन्ही उत्तरांना गुण मिळणार आहेत का, असतील तर हा बदल योग्य आहे.-ओरा चक्रे, गणित शिक्षक .

अत्यंत चुकीचा निर्णय आहे. बालभारतीला गणित विषयात बदल करून काय साध्य करायचे आहे, हेच कळत नाही. जोडाक्षरे उच्चारणामुळे विद्यार्थ्यांना काही परिणाम होत नाही. संख्या वाचनामुळे विद्यार्थ्यांना गणित सोपे जाईल, हा समज चुकीचा आहे.-मनीष गावंडे, राज्याध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक संघटना.शहरी व ग्रामीण भागातील मुलांना १00 पर्यंत पाढे येतात. त्यामुळे गणित विषयाची केलेली तोडफोड चुकीची आहे. एकवीसऐवजी वीस एक शिकविणे हास्यास्पद आहे. व्यवहारातही हेच सूत्र वापरणार आहोत का, आताची मुले हुशार आहेत. कठिणातले कठीणसुद्धा मुले सहज शिकतात. त्यामुळे बदल करण्याची गरज नव्हती.-मंगला पोहरे, शिक्षिका, फुलपाखरू मराठी प्राथमिक शाळा.गणित विषयामध्ये केलेल्या बदलाचा विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर परिणाम होणार आहे. जोडाक्षरे मुले लहानपणापासून शिकतात. उलट हे विद्यार्थ्यांना समजणार नाही. सध्याची मुले स्मार्ट अहेत. त्यांचे आकलन लक्षात घेऊन बदल करणे अपेक्षित होते.-आशू आल्हाद भावसार, पालक.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण