शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत 'लकी ड्रॉ' काढून रक्षाबंधनाचा अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:14 IST

दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनासोबतच लकी ड्रॉ काढून रक्षाबंधनाचा अभिनव प्रयोग राबविण्यात आला.

अकोला: आनंददायी शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांमध्ये भाऊ-बहिणीचे स्नेहाचे नाते जुळावे, हसत-खेळत शिक्षण घ्यावे, या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनासोबतच लकी ड्रॉ काढून रक्षाबंधनाचा अभिनव प्रयोग राबविण्यात आला.विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासोबतच सामाजिक संवेदना जोपासली जावी, नातेसंबधांची जाणीव व्हावी, नाती काय असतात, याचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवावेत, या दृष्टिकोनातून दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत अभिनव अशा रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन १५ आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, पातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ, केंद्र प्रमुख रफत खान हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय बरडे होते. यावेळी शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक विद्यार्थिनीने चिठ्ठी काढून ज्या विद्यार्थ्याच्या नावाची चिठ्ठी निघेल तिने त्या विद्यार्थ्याला राखी बांधावी. असा हा उपक्रम राबविण्यात आला. एवढेच नाही तर अधिकारी, शिक्षकांच्या नावानेसुद्धा चिठ्ठ्या काढण्यात आल्या. विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. या उपक्रमासाठी शाळेतील पदवीधर शिक्षक सुरेश कातखेडे, विषय शिक्षक सुभाष टोळे, सहायक शिक्षिका दीपाली अंबरकर, सुरेखा बिजवे, अनिता खडसे, कॉन्हेट शिक्षिका जया टिकार, आरती केने, रेखा खेडकर यांचे सहकार्य लाभले.

बहिणीला मिळाला लकी ड्रॉ पद्धतीने भाऊ!लकी ड्रॉ काढून नाव निघालेल्या भावाला बहिणीने राखी बांधली. नुसतीच राखी बांधली नाही तर त्या भावाने त्या बहिणीला मदतसुद्धा करायची. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात नात्यांची गुंफण सैल होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना नातेसंबध कळावे, नात्यांचे मोल कळावे, त्यांच्या कोवळ्या मनावर योग्य संस्कार व्हावेत, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम घेण्याची गरज असल्याचे मत शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाRaksha Bandhanरक्षाबंधनSchoolशाळा