शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

तेल्हारा तालुक्यात बोंडअळीचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 18:28 IST

शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेल्हारा : गेल्या चार पाच वर्षांपासून बोंडअळीच्या संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा त्याच संकटाने घेरले आहे. तेल्हारा शेतशिवारात मान्सूनपूर्व पेरलेल्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तेल्हारा तालुका हा कपाशीच्या पिकाकरिता सुपीक भाग मानल्या जातो. बीटी कपाशीचे उत्पन्न घेण्यास तालुका अग्रेसर आहे; परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून कपाशीवर दरवर्षी गुलाबी बोंडअळी विळखा घालत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकºयांनी जून महिन्यात लागवड केली आहे, त्या कपाशीला फूलपाती लागली आहे; परंतु त्यावर मात्र गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याचे दिसून आल्याने पिकांवरील नैसर्गिक संकटाची मालिका सुरू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. (तालुका प्रतिनिधी)मी माझ्या शेतामध्ये जून महिन्यात कपाशीची पेरणी केली. आज रोजी कपाशीला फुले धरली आहेत; परंतु या फुलपात्यामध्ये बोंडअळ्या दिसून आल्याने मजूर सांगून फुलपात्या तोडल्या आहेत. याबाबत कृषी विभागाला अवगत करण्यात आले असून, माझ्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.- प्रमोद गावंडे, शेतकरी, सात्काबाद, तेल्हारा.

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराagricultureशेतीFarmerशेतकरी