शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

 दलितांवरील अत्याचारात वाढ;आरक्षणाला धोका - फौजीया खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:22 IST

अकोला: राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून त्यांच्या आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचे टिकास्त्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री श्रीमती फौजीया खान यांनी सोडले.

ठळक मुद्देशुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्यावतीने ‘संविधान बचाओ,देश बचाओ’ मोहिम देशभरात राबविल्या जाणार असल्याची माहिती दिली. देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून स्वातंत्र्यांची दुसरी लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे फौजीया खान यांनी सांगितले. भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठीच पक्षाच्यावतीने देशभरात ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ मोहिम राबवली जात असल्याचे श्रीमती खान यांनी सांगितले.

अकोला: राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून त्यांच्या आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचे टिकास्त्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री श्रीमती फौजीया खान यांनी सोडले. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्यावतीने ‘संविधान बचाओ,देश बचाओ’ मोहिम देशभरात राबविल्या जाणार असल्याची माहिती दिली. भाजप सरकारच्या दडपशाहीमुळे देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून स्वातंत्र्यांची दुसरी लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे फौजीया खान यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या दडपशाहीमुळे भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला आहे. संविधानातील घटनात्मक तरतूदींना डावलून सर्वसामान्यांवर निर्बंध लादले जात आहेत. लोकशाहीचा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘मिडीया’वर सरकारचा दबाव असल्यामुळे न्याय मागणाºयांची गळचेपी होत आहे. महिला,तरूणींवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ झाल्याचे चित्र आहे. सरकारच्या दडपशाहीला विरोध किंवा मत व्यक्त केल्यास संबंधितांची हत्या घडविल्या जात असल्याचे राकाँ महिला अध्यक्ष फौजीया खान यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश, कॉ.गोविंद पानसरे, कलबुर्गी,नरेंद्र दाभोलकर यांच्या दिवसाढवळ हत्या झाल्या. त्यांच्या मारेकºयांचा शोध घेण्यात तपास यंत्रणांची दमछाक होतेच कशी,असा सवाल फौजीया खान यांनी उपस्थित केला. एकूणच देशात असुरक्षिततेचे वातावरण असून सामाजिक सलोखा धोक्यात सापडला आहे. भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठीच पक्षाच्यावतीने देशभरात ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ मोहिम राबवली जात असल्याचे श्रीमती खान यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पुणे येथील माजी महापौर राजश्री भोसले, प्रदेश सरसचिटणीस मंदा देशमुख, महिला ग्रामीण अध्यक्ष पद्मा अहेरकर, जिल्हाध्यक्ष विजयराव देशमुख, राकाँचे प्रदेश सचिव श्रीकांत पिसे पाटील, महानगराध्यक्ष राजू मुलचंदानी, महिला महानगराध्यक्ष रिजवाना शेख अजीज, शहर कार्याध्यक्ष भारती निम आदि उपस्थित होते.‘ईव्हीएम’,मनूस्मृतीची होळी!पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे १७ जुले रोजी वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान नागपूर येथे मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनची होळी केली जाणार आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे फौजिया खान यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेस