शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

 शेतात जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवा - डॉ. एन. सी. पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 13:46 IST

अकोला: शेतांना समृद्ध करायचे असेल तर जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार असल्याचे आवाहन गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांनी केले.

अकोला: शेतांना समृद्ध करायचे असेल तर जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार असल्याचे आवाहन गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांनी केले. ते म्हणाले, जे अशक्य आहे ते शक्य करणारे शास्त्रज्ञ आहेत. म्हणून येत्या काळात कृषी शास्त्रज्ञांवर मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात १५ व १६ मार्च रोजी सौर ऊर्जा कौशल्य विकास विषयावर आंतरराष्टÑीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन, आयसीएआरच्या एनएएचईपीचे राष्टÑीय समन्वयक डॉ. आर. बी. शर्मा, इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष मा. पा. इंद्रमनी, डॉ. पंकज पाठारे (ओमान), डॉ. पंदेकृविचे कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे व डॉ. सुरेंद्र काळबांडेयांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पटेल यांनी अक्षय ऊर्जा स्रोतांतर्गत गुजरात राज्यात उत्तम काम सुरू असून, शेतकऱ्यांना या ऊर्जेचा लाभ होत आहे. शेतीला लागणाऱ्या विजेची गरज यातून भागत असल्याने शेती उत्पादनात चांगलीच वाढ होत आहे. याला जोड म्हणून जैवखते व्यवस्थापनावर भर देऊन विषमुक्त अन्न निर्मितीवर भर देत असल्याचे सांगितले. जैवखते, कृषी अवजारे निर्मिती, अल्गीपासून बायोफ्युएल निर्मिती यासारख्या उद्योगाच्या संधी असून, मधमाशीपालन, त्यापासून सहद, फुलशेती कृषी आधारित उद्योगाचे पर्याय असल्याने शेतकऱ्यांनी याकडे वळण्याचे आवाहन केले. कुलगुरू डॉ. धवन यांनी मराठवाडा, विदर्भातील समस्या सारख्या असून, कृषी विद्यापीठाने कृषी उद्योग निर्मितीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. उद्योग निर्मितीत ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले. कुलगुरू डॉ. भाले यांनी हरितक्रांतीत कृषी अभियांत्रिकीची भूमिका मोलाची असल्याचे सांगताना सौर, वायू तथा बायोमासद्वारे ऊर्जा निर्मितीत वाढ करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. इथेनॉल निर्मिती एक उत्तम पर्याय असून, कृषी आधारित उद्योगासाठी एक चांगला पर्याय आहे. कृषी क्षेत्रात भरपूर उद्योगाच्या संधी असल्याने विद्यार्थ्यांनी नोकरीच्याच मागे न लागता, कृषी उद्योग तयार करू न रोजगार निर्मिती करावी, त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरू कता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ