शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

 शेतात जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवा - डॉ. एन. सी. पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 13:46 IST

अकोला: शेतांना समृद्ध करायचे असेल तर जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार असल्याचे आवाहन गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांनी केले.

अकोला: शेतांना समृद्ध करायचे असेल तर जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार असल्याचे आवाहन गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांनी केले. ते म्हणाले, जे अशक्य आहे ते शक्य करणारे शास्त्रज्ञ आहेत. म्हणून येत्या काळात कृषी शास्त्रज्ञांवर मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात १५ व १६ मार्च रोजी सौर ऊर्जा कौशल्य विकास विषयावर आंतरराष्टÑीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन, आयसीएआरच्या एनएएचईपीचे राष्टÑीय समन्वयक डॉ. आर. बी. शर्मा, इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष मा. पा. इंद्रमनी, डॉ. पंकज पाठारे (ओमान), डॉ. पंदेकृविचे कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे व डॉ. सुरेंद्र काळबांडेयांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पटेल यांनी अक्षय ऊर्जा स्रोतांतर्गत गुजरात राज्यात उत्तम काम सुरू असून, शेतकऱ्यांना या ऊर्जेचा लाभ होत आहे. शेतीला लागणाऱ्या विजेची गरज यातून भागत असल्याने शेती उत्पादनात चांगलीच वाढ होत आहे. याला जोड म्हणून जैवखते व्यवस्थापनावर भर देऊन विषमुक्त अन्न निर्मितीवर भर देत असल्याचे सांगितले. जैवखते, कृषी अवजारे निर्मिती, अल्गीपासून बायोफ्युएल निर्मिती यासारख्या उद्योगाच्या संधी असून, मधमाशीपालन, त्यापासून सहद, फुलशेती कृषी आधारित उद्योगाचे पर्याय असल्याने शेतकऱ्यांनी याकडे वळण्याचे आवाहन केले. कुलगुरू डॉ. धवन यांनी मराठवाडा, विदर्भातील समस्या सारख्या असून, कृषी विद्यापीठाने कृषी उद्योग निर्मितीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. उद्योग निर्मितीत ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले. कुलगुरू डॉ. भाले यांनी हरितक्रांतीत कृषी अभियांत्रिकीची भूमिका मोलाची असल्याचे सांगताना सौर, वायू तथा बायोमासद्वारे ऊर्जा निर्मितीत वाढ करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. इथेनॉल निर्मिती एक उत्तम पर्याय असून, कृषी आधारित उद्योगासाठी एक चांगला पर्याय आहे. कृषी क्षेत्रात भरपूर उद्योगाच्या संधी असल्याने विद्यार्थ्यांनी नोकरीच्याच मागे न लागता, कृषी उद्योग तयार करू न रोजगार निर्मिती करावी, त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरू कता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ