शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णसंख्येत वाढ, एसटीची प्रवासीसंख्या जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 11:45 IST

Akola ST BUS News पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे; तरीही एसटीच्या प्रवाशांच्या संख्येवर याचा पाहिजे तसा परिणाम झाला नाही.

अकोला: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रवास करण्यावर निर्बंध लादले आहेत. मात्र, तरीही प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे गतवर्षी २२ मार्चपासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद केल्या होत्या. त्यानंतर, अनलॉक प्रक्रियेंतर्गत टप्प्याटप्याने बसफेऱ्या सुरू केल्या. जिल्ह्यात सुरुवातीला दिवसभरातील प्रवासीसंख्या सहा हजार होती. मात्र, त्यानंतर प्रवासीसंख्या वाढायला लागली. ही संख्या दिवसभरात ६० हजारांवर पोहोचली होती. आता गत पंधरवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे २३ फेब्रुवारीपासून पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तरीही एसटीच्या प्रवाशांच्या संख्येवर याचा पाहिजे तसा परिणाम झाला नाही.

चार ते पाच हजार प्रवाशांचा अपवाद वगळता इतर प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू असल्याचे चित्र आहे. एसटीच्या मर्यादित फेऱ्याच रद्द करण्यात आल्याने मागील लॉकडाऊनसारखा यावेळी एसटी महामंडळाला सध्यातरी आर्थिक फटका बसलेला नाही. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, प्रवाशांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याची गरज आहे.

तोंडाला मास्क लावण्यासह सॅनिटायझरच्या वापराकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. एसटी महामंडळानेही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

आंतर जिल्ह्यातही प्रवासी वाहतूक

जिल्ह्यातील सातही आगारांतून जिल्हाबाह्य प्रवासी वाहतूक सुरू आहे. लांब पल्ल्याच्याही बसफेऱ्या धावतात. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नाशिक, औरंगाबाद आदी बसफेऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या ठिकाणाहूनही प्रवासी प्रवास करत आहेत. यामुळे या प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग

कोरोनानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या कमी केल्या आहेत. प्रवासी वाढल्याने बस भरून धावत आहेत. मात्र, बहुतांश प्रवासी मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत, तसेच बसमध्ये गर्दी राहत असल्याने एका सीटवर कधी दोन, तर कधी तीन जण बसून प्रवास करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

 

ग्रामीण, तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या बसफेऱ्या बंदच

‘गाव तेथे एसटी’ अशी राज्य परिवहन महामंडळाने मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत जेथे रस्ता असेल, तेथे एसटी धावत होती. मात्र, कोरोनामुळे गत २३ मार्चपासून बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर, काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या, परंतु अद्यापही ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अत्यावश्यक कामासाठी प्रवास करताना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी