शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

अतिसारच्या रुग्णांमध्ये वाढ : दूषित पाण्यामुळे वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:16 IST

आठवड्याभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अतिसार व गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

अकोला : गत आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार संततधार पावसाने हजेरी लावली. या कालावधीत पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याने जलजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आठवड्याभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अतिसार व गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.पावसाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव व थंड हवामानामुळे वातावरणात रोगजंतुचा प्रादूर्भाव वाढतो. सर्वत्र घाण साचल्याने भूमिगत जलस्रोत दूषित होतात, तसेच साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्तीही वाढीस लागते. गत आठवड्याभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रोगजंतूंसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने विविध आजारांनी डोके वर काढले आहे. गत आठवड्याभरात सर्वोपचार रुग्णालयात ५० पेक्षा जास्त अतिसार व गॅस्ट्रोच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटांच्या विकारात वाढ झाली असून, जुलाब, हगवण अशी लक्षणे असलेले रुग्ण घराघरांमध्ये आहेत; तसेच ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणेही रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. असे रुग्णही दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल होत असून, सर्वोपचार रुग्णालयासह खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाल्याचे चित्र आहे.ओपीडी फुल्ल; डॉक्टरांची वानवापावसाळ्यात विविध आजारांनी डोके वर काढल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध डॉक्टरांवर ताण येत आहे. सर्वोपचारमध्ये दररोज साधारणपणे दोन हजार रुग्ण उपचारासाठी येतात; परंतु गत आठवडाभरात हा आकडा चार हजाराच्या घरात गेला आहे.दूषित पाणी आणि माशांमुळे धोकादूषित पाणी पिण्यात आल्याने पोटाचे विकार संभवतात. खाद्य पदार्थांवर बसणाऱ्या माशांमुळेही पोटाच्या विकारांचा जास्त धोका उद््भवतो. त्यामुळे घरात स्वच्छता पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.अशी घ्या काळजी

  • उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळा
  • पाणी उकडूनच प्यावे
  • घरातील परिसर कोरडा ठेवावा
  • माशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी स्वच्छता राखा
  • लक्षणे आढळताच डॉक्टरांना दाखवा

 

पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने रोगजंतुंना तो पोषक ठरतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पाणी उकडून पिणे, उघड्यावरील पदार्थ न खाणे, स्वच्छता बाळगणे अशा प्रकारची खबरदारी घेतल्यास आजारांपासून बचाव करता येतो. आजारी पडल्यास आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार करून घ्यावे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य