शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

तेल्हारा तालुक्यात ग्राम बाल संरक्षण समितीने रोखला बालविवाह

By रवी दामोदर | Updated: May 17, 2024 18:20 IST

ग्राम बाल संरक्षण समितीच्या जागरूकतेमुळे तेल्हारा तालुक्यातील एका गावात होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात यश आले.

अकोला: ग्राम बाल संरक्षण समितीच्या जागरूकतेमुळे तेल्हारा तालुक्यातील एका गावात होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात यश आले. तेल्हारा तालुक्यातील सौंदळा गावामध्ये दि. १६ मे  रोजी बालविवाह असल्याची माहिती ग्राम बाल संरक्षण समितीला मिळाली होती. त्यानुसार ग्राम बाल संरक्षण समिती व हिवरखेडचे पोलिस निरीक्षक, तसेच संबंधित गावातील कर्मचाऱ्यांनी विवाहस्थळी भेट दिली. मुलीच्या जन्मतारखेची पडताळणी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. यावेळी दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन बालविवाह प्रतिबंधक अधिनियमबाबत माहिती दिली. 

अठरा वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न करणार नसल्याचे हमीपत्र दोन्ही कुटुंबियांकडून लिहुन घेण्यात आले आहे. बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबतही माहिती देण्यात आली. बालविवाह ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून बालविवाहाला प्रतिबंधासाठी जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावपातळीवर कार्यरत ग्राम बाल संरक्षण समितीमार्फत माहिती मिळाल्यास तत्काळ दखल घेउन बालविवाह थांबवणे शक्य होते.जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी सुजाण नागरिक व संघटनांनी पुढाकार घेण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाmarriageलग्न