शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

अकोला जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, पिके मातिमोल; बळीराजाचं मोठं नुकसान

By रवी दामोदर | Updated: February 27, 2024 16:18 IST

१४ मि.मी. पाऊस बरसला : गहू, हरभऱ्यासह फळबागांना फटका

अकोला :  जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने सोमवारी मध्यरात्री हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिके ऐन सोंगणीला आले असताना अवकाळी पावसामुळे गहू, हरभऱ्यासह लिंबू व इतर फळबाग पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात गत २४ तासात १४ मि.मी. पाऊस बरसला असून, त्यामध्ये तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूरसह बार्शीटाकळी तालुक्यात धुव्वाधार पाऊस झाला. 

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री वादळवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.  काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे रब्बी पिके मातीमोल झाले आहेत. 

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी

अतिवृष्टी व पीक विम्याचे पैसे मिळणे बाकी असताना आता शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामातील पिकांचा तत्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

जिल्ह्याचा येलो अलर्ट कायमनागपूर हवामान विभागाच्यावतीने जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. दि.२८ व २९ फेब्रुवारीनंतर पुन्हा मार्च महिन्याच्या सुरुवातीला १ मार्च ते २ मार्च रोजी येलो अलर्ट कायम आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बार्शीटाकळी तालुक्यात पक्षांचा मृत्यूबार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात गारपीट झाल्याने गहू व हरभरा जमिनदोस्त झाला आहे. दरम्यान गारपीटीमुळे निहीदा, लखमापूर, सावरखेड परिसरात पक्षांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

टॅग्स :RainपाऊसAkolaअकोला