शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पीक कर्ज वाटपाच्या धोरणात हवी सुधारणा - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:31 IST

अकोला: शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याच्या धोरणात सुधारणा आवश्यक असून, यासंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, असे मत कै .वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी येथे ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- संतोष येलकरअकोला: शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याच्या धोरणात सुधारणा आवश्यक असून, यासंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, असे मत कै .वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी येथे ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.बँकांनी गावपातळीवर जाऊन खरीप आणि रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने कायदा करण्याची गरज आहे. बँकांनी ग्रामपातळीवर शेतकºयांना कर्ज वाटप केल्यास खरीप आणि रब्बी हंगामातील पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळणार आहे, असेही किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले.राज्यात केवळ ३६ हजार कोटींचे पीक कर्ज वाटप!गतवर्षीच्या खरीप हंगामात राज्यात एक लाख कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ ३६ हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकºयांना वाटप करण्यात आले. त्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यात २० टक्क्यांपेक्षा अधिक पीक कर्जाचे वाटप करण्यात आले नाही, अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली.कर्ज वसुलीचा कालावधी पाच वर्षांचा करावी!शेतकºयांना सतत दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेल्या शेतकºयांसाठी पीक कर्ज वसुलीचा कालावधी पाच वर्षांचा केला पाहिजे, अशी मागणी तिवारी यांनी केली.पीक नुकसान भरपाईसाठी ग्रामसभेचा निर्णय अंतिम मानावा!प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या शेतकºयांना विमा रकमेचा लाभ मिळावा, यासाठी पीक नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये ग्रामसभेचा निर्णय अंतिम मानावा, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.दोन हेक्टरची मर्यादा काढली; प्रभावी अंमलबजावणी हवी!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह विविध योजनांतर्गत शेतकºयांना देण्यात येणाºया मदतीसाठी दोन हेक्टरची मर्यादा काढण्याचे सूतोवाच केंद्र सरकारमार्फत करण्यात आले आहे. शेतकºयांना मदत देण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत शेतीची मर्यादा काढण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाkishor kumarकिशोर कुमार