शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पीक कर्ज वाटपाच्या धोरणात हवी सुधारणा - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:31 IST

अकोला: शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याच्या धोरणात सुधारणा आवश्यक असून, यासंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, असे मत कै .वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी येथे ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- संतोष येलकरअकोला: शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याच्या धोरणात सुधारणा आवश्यक असून, यासंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, असे मत कै .वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी येथे ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.बँकांनी गावपातळीवर जाऊन खरीप आणि रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने कायदा करण्याची गरज आहे. बँकांनी ग्रामपातळीवर शेतकºयांना कर्ज वाटप केल्यास खरीप आणि रब्बी हंगामातील पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळणार आहे, असेही किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले.राज्यात केवळ ३६ हजार कोटींचे पीक कर्ज वाटप!गतवर्षीच्या खरीप हंगामात राज्यात एक लाख कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ ३६ हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकºयांना वाटप करण्यात आले. त्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यात २० टक्क्यांपेक्षा अधिक पीक कर्जाचे वाटप करण्यात आले नाही, अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली.कर्ज वसुलीचा कालावधी पाच वर्षांचा करावी!शेतकºयांना सतत दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेल्या शेतकºयांसाठी पीक कर्ज वसुलीचा कालावधी पाच वर्षांचा केला पाहिजे, अशी मागणी तिवारी यांनी केली.पीक नुकसान भरपाईसाठी ग्रामसभेचा निर्णय अंतिम मानावा!प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या शेतकºयांना विमा रकमेचा लाभ मिळावा, यासाठी पीक नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये ग्रामसभेचा निर्णय अंतिम मानावा, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.दोन हेक्टरची मर्यादा काढली; प्रभावी अंमलबजावणी हवी!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह विविध योजनांतर्गत शेतकºयांना देण्यात येणाºया मदतीसाठी दोन हेक्टरची मर्यादा काढण्याचे सूतोवाच केंद्र सरकारमार्फत करण्यात आले आहे. शेतकºयांना मदत देण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत शेतीची मर्यादा काढण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाkishor kumarकिशोर कुमार