शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

परतीच्या पावसाचा तडाखा; वीज पडून सहा जखमी, पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 19:01 IST

Akola, Rain, Crop loss शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

ठळक मुद्देजिल्ह्यात वीज पडून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जोरदार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.दरम्यान, जिल्ह्यात वीज पडून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील खांदला येथील दोन जण भाजल्या गेले, तर बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद शिवारात शेळ्या-मेंढ्या चारणाऱ्या गुराख्याच्या झोपडीवर वीज पडून चौघे जखमी झाले आहेत.जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले. रविवारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील खांदला येथील विजय दशरथ पिंपळे (४७) व सुनील आधार मोहिते (२५) हे दोघे शेतात गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास तालुक्यात पावसाने अचानक विजेच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावली. या दोघांच्या अंगावर वीज पडून ते भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खु. नजीक शेतात शेळ््या-मेंढ्या चारणाºया गुराख्यांनी ठिय्या दिला आहे. गुराख्यांच्या ठिय्यावर वीज पडल्याने आईसह तीन मुले गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी अचानक पाऊस सुरू झाल्याने आई संध्या सदाशिव दडस (४५), मुलगी सीमा सदाशिव तडस (१८), मुलगी सपना सदाशिव तडस (१९) व मुलगा प्रवीण सदाशिव तडस (२१) हे गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 पिकांचे नुकसान!

 रविवारी दुपारी तीनच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सध्या शेतात सोयाबीन, ज्वारी पिकाची कापणी करून ठेवली असताना येणाºया परतीच्या पावसाने शेतकºयांची चिंता वाढवली आहे. परतीचा पाऊस सर्वदूर झाला असून, पिकांची नासाडी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकºयांना बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली होती.  गत दोन-तीन दिवसांपासून परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या सोयाबीन, ज्वारी पिकांची सोंगणीची लगबग सुरू असून, शेतकरी कामात व्यस्त आहे. हातातोंडाशी आलेला घास निघून जाऊ नये, म्हणून शेतकरी धावपळ करीत आहे; मात्र जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे सोंगणी केलेले सोयाबीन पीक भिजले. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे शेतात गेलेल्या शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

टॅग्स :RainपाऊसAkolaअकोला