शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परतीच्या पावसाचा तडाखा; वीज पडून सहा जखमी, पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 19:01 IST

Akola, Rain, Crop loss शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

ठळक मुद्देजिल्ह्यात वीज पडून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जोरदार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.दरम्यान, जिल्ह्यात वीज पडून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील खांदला येथील दोन जण भाजल्या गेले, तर बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद शिवारात शेळ्या-मेंढ्या चारणाऱ्या गुराख्याच्या झोपडीवर वीज पडून चौघे जखमी झाले आहेत.जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले. रविवारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील खांदला येथील विजय दशरथ पिंपळे (४७) व सुनील आधार मोहिते (२५) हे दोघे शेतात गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास तालुक्यात पावसाने अचानक विजेच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावली. या दोघांच्या अंगावर वीज पडून ते भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खु. नजीक शेतात शेळ््या-मेंढ्या चारणाºया गुराख्यांनी ठिय्या दिला आहे. गुराख्यांच्या ठिय्यावर वीज पडल्याने आईसह तीन मुले गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी अचानक पाऊस सुरू झाल्याने आई संध्या सदाशिव दडस (४५), मुलगी सीमा सदाशिव तडस (१८), मुलगी सपना सदाशिव तडस (१९) व मुलगा प्रवीण सदाशिव तडस (२१) हे गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 पिकांचे नुकसान!

 रविवारी दुपारी तीनच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सध्या शेतात सोयाबीन, ज्वारी पिकाची कापणी करून ठेवली असताना येणाºया परतीच्या पावसाने शेतकºयांची चिंता वाढवली आहे. परतीचा पाऊस सर्वदूर झाला असून, पिकांची नासाडी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकºयांना बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली होती.  गत दोन-तीन दिवसांपासून परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या सोयाबीन, ज्वारी पिकांची सोंगणीची लगबग सुरू असून, शेतकरी कामात व्यस्त आहे. हातातोंडाशी आलेला घास निघून जाऊ नये, म्हणून शेतकरी धावपळ करीत आहे; मात्र जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे सोंगणी केलेले सोयाबीन पीक भिजले. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे शेतात गेलेल्या शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

टॅग्स :RainपाऊसAkolaअकोला