अकोला : गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी यवतमाळ जिल्हय़ातील उमरखेड येथे किरकोळ कारणावरून दंगल उसळून उत्सवाला गालबोट लागले. अकोला शहर हे अतिसंवेदनशील असल्याने अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती या ठिकाणी व्हायला नको. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करून खबरदारी घेण्याच्या सूचना बुधवारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी येथे केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी दुपारी ४ वाजता त्यांनी अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या उपस्थितीत गणेश मिरवणुकीसंदर्भात बैठक घेतली. बैठकीला पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा, मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदींची बैठकीला उपस्थित होती. यावेळी जिल्हाधिकारी अरुण शिंदे व विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी ८ सप्टेंबर रोजी शहरातून निघणार्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकसंदर्भात आढावा घेतला आणि शहर अतिसंवेदनशील असल्याने उत्सवाला गालबोट लागू नये. यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करून, अ ितसंवेदनशील भागांमध्ये सुरक्षा कठडे व बॅरिकेट्स लावण्यात यावे आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही केल्या. आयजींनी शहरातील सातही ठाणेदारांचीही बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. विभागीय आयुक्तांनी केली पाहणीविभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, आयजी बिपीन बिहारी, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी बुधवारी ४.३0 वाजताच्या सुमारास जय हिंद चौक, दगडीपूल, सुभाष चौक, ताजनापेठ पोलिस चौकी, गांधी चौक परिसरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी केली. त्यांच्यासोबत मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर आदी होते. *शांतता समितीची बैठक शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत चर्चा करण्यासाठी सा तही पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या शांतता समिती सदस्यांची ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. असे पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी एपीआय भाऊराव घुगे यांनी कळविले आहे. *आकोटला ९ तर पातूरला ८ सप्टेंबरला विसर्जनबैठकीमध्ये अतिसंवेदनशील असलेल्या आकोट व पातूर तालुक्यातील गणेश विसर्जनासंदर्भातसुद्धा चर्चा झाली. यामध्ये आकोट येथे ९ सप्टेंबरला, पातूर येथे ८ स प्टेंबरला तर जिल्हय़ातील हिवरखेड येथे ९ व १0 स प्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार असल्याचे निश्चित करण्यात आले. इतर ठिकाणी ८ सप्टेंबर रोजी मिरवणूक निघेल.
आयजींनी केली गणेश मिरवणूक मार्गाची पाहणी
By admin | Updated: September 4, 2014 01:32 IST