शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

देश उन्नत करायचा असेल, तर आधी खेडी उन्नत करणे गरजेचे - डॉ. विजय भटकर

By atul.jaiswal | Updated: February 5, 2018 17:02 IST

अकोला: देशामध्ये ६ लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.

ठळक मुद्देडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत सोहळा थाटात.कृषीमंत्री पांडुरंग फुडंकर, माजी मुख्य सचिव (कृषि) उमेशचंद्र्र सारंगी, कुलगुरु डॉ.विलास भाले, कुलसचिव कडू यांची प्रमुख उपस्थिती.या पदवीदान समारंभात २६३२ पदवीधरांना पदवीदान करण्यात आले.

अकोला: देशामध्ये ६ लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा प्रतिकुलपती पांडुरंग फुडंकर ,माजी मुख्य सचिव (कृषी ) उमेशचंद्र्र सारंगी तसेच डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला चे कुलगुरु डॉ.विलास भाले व विद्यापीठाचे कुलसचिव कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. विजय भटकर म्हणाले की, भारतात कृषि ऋषी संस्कृती असून, जगातील सर्वात जुने ज्ञानावर आधारीत कृषी  संस्कृती आहे. जगातील पहिले विश्वविद्यालय नालंदा विश्वविद्यालय होते. त्यामुळे वैदिक काळात भारताला वैभव प्राप्त होते. परंतू कालांतराने यामध्ये बदल झाला आहे. भारतातला उन्नत राष्ट्र बनवून प्रत्येक महाविद्यालयाने ग्राम पंचायती दत्तक घेवून त्याठिकाणी प्रयोग संशोधन, व आणि नविन उपक्रमासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळे गावाची उन्नती होईल. उन्नत भारताच्या उदिष्टासाठी भारतातील प्रमुख शैक्षणिक संशोधन संस्था यांनी ज्ञानांची शक्ती वाढवून त्याशक्तीचा उपयोग गावामध्ये नविन तंत्रज्ञान , पध्दती आणि धोरणाचा वापर करून गावाच्या शाश्वत विकासाला चालना देणे आवश्यक आहे. यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी स्वागतपर प्रास्ताविकातुन विद्यापीठाच्या वाटचालीचा आलेख उपस्थिता समोर मांडला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.यावेळी विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेचे सदस्य माजी कुलगुरु , प्राचार्य, प्राद्यापक,संशोधक,विभाग प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी इच्छाशक्तीद्वारे आव्हानांवर मात करावी - सारंगीप्रतिकुल परिस्थीतीतही आव्हानाला मात करून आपली इच्छा शक्ती प्रबल करून अधिक आत्मविश्वासाने व सशक्तपणे विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील आयुष्यात उभे राहावे असे प्रतीपादन कृषी विभागाचे माजी मुख्य सचिव उमेशचंद्र सारंगी यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आपला मार्ग स्वत: निवडावा लागेल पुढील आयुष्यात उच्च शिक्षण प्राप्त करणे, संशोधन करणे, कापोर्रोट विभागात काम करणे किंवा पुर्णपणे नवीन मार्ग आपणासाठी खुले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकºयांची परिस्थीती मजबुत करावयाची असेल तर विदयापीठांनी नविन वान , संकरीत बियाणे ,कृषी तंत्रज्ञान व शेतकºयांना परवडण्याजोगे किड व रोगांना नियंत्रण करण्याच्या दृष्टीने संशोधन विकसीत करणे गरजेचे आहे. यासोबतच शेतक-यांना कृषी प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी विदयापीठांनी प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

२६३२ विद्यार्थ्यांना पदवीदानया पदवीदान समारंभात २६३२ पदवीधरांना पदवीदान करण्यात आले. यात बी.एस.सी. कृषीचे १७७३, बी.एस.सी. उद्यानविद्या १२३, बी.एस.सी.कृषी जैवतंत्रज्ञान १०७, बी.टेक कृषी अभियांत्रिकी १२७, एम.एस.सी.कृषी २३८, आणि पी.एच.डी.च्या ४१ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषकाचे वितरण करण्यात आले.

प्राध्यापकांचा गौरवउत्कृष्ट शिक्षक म्हणुन डॉ. नारायण मुरलीधर काळे यांना रजत पदक देवुन सन्नमानीत केले. यावेळेस डॉ. बी.ए. सोनुने, डॉ. व्ही. के खर्चे , डॉ. व्ही.व्ही.गभणे, डॉ. एन.एम. कोंडे, डॉ. आर. एन. काटकर, यांना उत्कृष्ठ संशोधन केल्याबद्दल तसेच संशोधन कायार्साठी व विदयापीठ क्षेत्रातील शेतक-यांना तात्काळ पोचविण्यासाठी डॉ.पिके नागरे , डॉ. डी. एच. पैठणकर, डॉ. एकता बागडे, डॉ. व्ही.व्ही. सोनाळकर, व डॉ. एके सदावर्ते यांना रोख पारितोषीक देवुन सन्नमानीत करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ठ संशोधन केल्याबद्दल डॉ. गुरमित सींग बुट्टर यांना सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून संजयकुमार किसनराव कुसटकर यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ