शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

निदान लवकर झाल्यास कॅन्सरवर मात शक्य

By admin | Updated: April 27, 2017 01:29 IST

कॅन्सर तज्ज्ञांची माहिती : लोकमत सखी मंच व कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलतर्फे ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ परिसंवाद

अकोला : कॅन्सरबाबत लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. जर प्राथमिक अवस्थेतच या आजाराचे निदान झाल्यास ‘कॅन्सर’वर पूर्णपणे मात करणे शक्य असल्याची माहिती कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. इमरान निसार शेख व डॉ. नविता पुरोहित यांनी दिली. ‘लोकमत’च्या एक जीवन स्वस्थ जीवन’ मोहिमेंतर्गत लोकमत सखी मंच व कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता माहेश्वरी भवन येथे ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.व्यासपीठावर ‘आयएमए’चे अध्यक्ष पुरुषोत्तम तायडे, तुकाराम हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. माहेश्वरी, कोकीलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटलचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. इमरान निसार शेख व डॉ. नविता पुरोहित उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.महाराष्ट्रात ‘लोकमत’च्या माध्यमातूनच कॅन्सरमुक्तीसाठीचा सामाजिक संदेश करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतो, असे सांगितले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थितांच्या मनातील शंकाही दूर होतील, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. इमरान निसार शेख यांनी सांगितले की, कॅन्सर महिला व पुरूष दोघांनाही होऊ शकतो; मात्र पुरुषांमध्ये प्रमाण जेमतेम १ टक्का आहे. महिलांना धोका अधिक आहे; मात्र ५० टक्के महिला त्रास झाला तरी अंगावर काढतात. काही गाठ असल्याचे समजले तरी भीतीपोटी व लाजेपोटी लपवून ठेवतात. समजल्यावर उपचारासाठी येतात, तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे उपचारही कठीण होतात. त्यामुळे स्तनात गाठ झालेली असल्यास लपवू नका. लगेचच डॉक्टरांकडे जा, असा सल्ला त्यांनी दिला. चांगला आहार घ्या, घाम येईपर्यंत व्यायाम करा. तसेच जशी शरीराची काळजी घेतात, तशी महिन्यातून एकदा पाच मिनिट काढून स्तनांची स्वत:च तपासणी करून गाठ नाही ना? याची खात्री घ्या. स्तनावर तीळ येणे, रक्त येणे, गाठ होणे ही कॅन्सरची लक्षण असू शकतात, असे सांगितले. यावेळी डॉ. इमरान निसार शेख यांनी उपस्थित महिलांच्या शंकांचे निरसनही केले. यावेळी कॅन्सरमुळे स्वत:चा कुटुंबीयांना गमावलेल्या सदस्याच्या समस्यांचे निरसन केले. त्यासाठी देवानेच शक्ती दिली. त्यामुळे कॅन्सर झालेल्या रुग्णाने अथवा त्याच्या कुटुंबियांनी घाबरून न जाता धैर्याने सामोरे जावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा गाडगे यांनी केले.