शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

सिबिलचा गुणांकन ७२० पेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांना पीक कर्ज नाही

By राजेश शेगोकार | Updated: April 5, 2023 17:22 IST

‘मेरा गाव, मेरी संसद’ : शेतकरी जागर मंचचा गावागावात जागर, शेतकऱ्यांना खरीप किंवा रबी या दोन्ही हंगामांत पीक कर्जामुळे आर्थिक मदत होत असते. मात्र, आता सिबिलमुळे पीक कर्ज घेणे अडचणीचे ठरणार आहे

अकाेला - पीक कर्जासाठी आता सिबिलची जाचक अट पुढे करण्यात आली असून, या अटीमुळे ९० टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार आहे. सिबिलचा गुणांकन ७२० पेक्षा कमी असल्यास कर्ज मिळत नाही याची कारणे जाणून न घेता सरसकट शेतकऱ्याना वेठीस धरणे चुकीचे असून  यासंदर्भात जनजागृतीसाठी शेतकरी जागर मंच जिल्हाभरात ‘मेरा गाव, मेरी संसद’ अभियान राबवित आहे. १ मे कामगारदिनी शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांनी दिली. 

शेतकऱ्यांना खरीप किंवा रबी या दोन्ही हंगामांत पीक कर्जामुळे आर्थिक मदत होत असते. मात्र, आता सिबिलमुळे पीक कर्ज घेणे अडचणीचे ठरणार आहे. आता शासनाने सिबिलचे भूत आणल्याने सिबिलच्या गुणांकनामध्ये अंदाजे ९० टक्के शेतकरी पीक कर्जासाठी अपात्र ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कर्जाअभावी पुन्हा शेतकरी आत्महत्येकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सिबिल अट त्वरित रद्द करण्यात यावी, अन्यथा शेतकरी जागर मंचच्या वतीने कामगार दिनी  आंदोलन करण्यात येणर आहे  

सिबिलसंदर्भात मुर्तीजापूर तालुक्यातील १५० च्या वर गावांमध्ये जनजागृती करण्याला सुरुवात झाली आहे.  सिबिलचा गुणांकन ७२० पेक्षा कमी असल्यास कर्ज मिळत नाही. त्याची मुख्य कारणे म्हणजे कर्जात नियमित हप्ते न भरणे, वन टाइम सेटलमेंट जमादार असलेल्या कर्जदाराने कर्ज न भरणे, डिफॉल्टर होणे, यापूर्वी कधी कर्ज न घेतल्यास, परतफेड केलेल्या कर्जाची माहिती बँकेने सिबिल (क्रेडिट ब्युरो) ला न दिल्यास, क्रेडिट कार्डची लिमिट वारंवार वापरत असल्यास गुण कमी होतात. शेतकरी जागर मंचाच्या वतीने तालुक्यातील कवठा या गावांमध्ये जनजागृती करून आंदोलनाला सुरुवात केली आहे, यावेळी जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, अरुण बोंडे, श्रीकृष्ण बोळे, वासुदेवराव बोळे, राजू वानखडे, रामचंद्र तायडे, अरविंद तायडे, राम कोरडे, भावसुंदर वानखडे, सुधाकर गौरखेडे, मंगेश कुकडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी