शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

फिल्डवरील बातम्या छापून आल्यासच विद्यार्थ्यांना गुण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:22 IST

घेतलेल्या उपक्रमाच्या वृत्तपत्रातून कमीत कमी तीन बातम्या छापून आल्यासच गुण दिले जातील, असे असे बंधनकारक करून कृषी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहेत.

अकोला: कृषी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एन्टर्नशीप करावी लागते. एका गावामध्ये दोन विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवून विविध उपक्रम राबविण्यास सांगितले जाते. घेतलेल्या उपक्रमाच्या वृत्तपत्रातून कमीत कमी तीन बातम्या छापून आल्यासच गुण दिले जातील, असे असे बंधनकारक करून कृषी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहेत. त्यामुळे विद्यार्थी वृत्तपत्र कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत. कृषी महाविद्यालयांच्या या फर्मानामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्नित कृषी महाविद्यालयांमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेताना, एन्टर्नशीप करावी लागते. एन्टर्नशीप करताना, एका गावातील शेतकºयाची निवड करून दोन विद्यार्थ्यांना त्याच्याकडे प्रयोग राबविण्यासाठी पाठविले जाते. त्या शेतकºयाच्या शेतात केलेले प्रयोग, राबविलेले उपक्रम आणि कृषी महाविद्यालयांमध्ये घेतलेले उपक्रमाचे वृत्तांकन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले तर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचे गुण देण्याची अनोखी पद्धतच कृषी महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वर्षभर अभ्यास करून, दिलेल्या कार्यक्षेत्रावर काम करूनही विद्यार्थ्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्यामुळे विद्यार्थीही वृत्तपत्रांमध्ये बातमी छापून आणण्यासाठी आग्रहाची भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. वर्षभरात घेतलेल्या उपक्रमांच्या तीन बातम्या प्रकाशित झाल्या आणि त्याचे कात्रण विद्यार्थ्यांनी जोडले तर त्यांना गुण देण्याचा प्रकार शिक्षण पद्धतीमध्ये प्रथमच समोर आला आहे. फिल्डवरील केलेल्या कामाच्या, उपक्रमाच्या बातम्या छापून आल्या पाहिजेत. यासाठी विद्यार्थीसुद्धा आग्रही असतात. बातम्या छापून आल्या नाही तर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाचे गुण दिले जात नाहीत. कृषी महाविद्यालयांच्या या भूमिकेमुळे विद्यार्थी वेठीस धरले जात आहेत. (प्रतिनिधी)

रावेच्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या उपक्रमाच्या कमीत कमी तीन बातम्या प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांना सांगितले जाते; परंतु विद्यार्थ्यांना हे बंधनकारक नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रावर काम करावे, हा त्यामागील उद्देश आहे.-डॉ. राम खरडे, प्राचार्य,सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय

रावेच्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची एन्टर्नशीप करावी लागते. या एन्टर्नशीपदरम्यान दिलेले उपक्रम विद्यार्थी राबवितात; परंतु त्या उपक्रमांच्या बातम्या छापून आल्याच पाहिजे. याचे कोणतेही बंधन नाही. जे कार्यक्रम घेतले, ते विद्यार्थी त्यांच्या डायरीमध्ये नोंदवितात. त्यासाठी त्यांचा एक समन्वयकसुद्धा असतो. कार्यक्रमाच्या बातम्या छापून आल्या तरच गुण दिले जातील. हे चुकीचे आहे आणि विद्यापीठाने असे कोणतेही बंधन लादलेले नाही.-डॉ. श्यामसुंदर माने, सहयोगी अधिष्ठाताडॉ. पं.दे. कृषी महाविद्यालय

 

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी